शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता आल्यास न्याय योजना राबवून पारखणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 07:47 IST

केरळमध्ये न्याय योजना यशस्वी ठरल्यास काँग्रेसशासित अन्य राज्यांतही ही योजना राबविली जाईल.

कोट्टयम : काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार केरळमध्ये आल्यास किमान उत्पन्न योजना (न्याय योजना)  राबवून पारखली जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील जनतेला दिले. न्याय योजना यशस्वी होईल, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले. 

पुथूपल्ली विधानसभा मतदारसंघातील मनारकाड येथील एका नाक्यावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ओम्मेन चंडी यांनी ५० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रचारादरम्यान राहुल गांधी उघड्या वाहनात होते. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही होते. न्याय योजनेंतर्गत वार्षिक ७२,००० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.  पुढे काय होणार आहे, हे आम्ही जाणून आहोत.  हा नवीन विचार आम्ही पारखून पाहणार आहोत. ही योजना गरिबीचा शेवट करणारी ऐतिहासिक योजना असल्याचे त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले  होते.

केरळमध्ये न्याय योजना यशस्वी ठरल्यास काँग्रेसशासित अन्य राज्यांतही ही योजना राबविली जाईल. गरिबीशी कसा लढा द्यावा, हे केरळ उर्वरित देशाला दाखविणार आहे, असेही ते म्हणाले. या आधी जाहीरसभेत राहुल गांधी म्हणाले की, आमचे सरकार आल्यास निर्धारित दिवसांत न्याय योजना सुरू करणार आहोत. नोटाबंदी, कोविड-१९ ची साथ आणि जीएसटीच्या सदोष अंमलबजावणीमुळे ढासळलेली भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधी