शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

PM मोदी जाऊ शकतात तर भारतीय संघ का नाही?; चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन तेजस्वी यादवांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:31 IST

भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी भाष्य केलं आहे.

Tejashwi Yadav: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यांच्यातील वादामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघालापाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुनच आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. शेजारी देशांत जाऊन क्रिकेट खेळण्यावर आक्षेप का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव हे देखील व्यावसायिक क्रिकेटपटू होते.

पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तानला जाणार नाही असे बीसीसीआयने आयसीसीला स्पष्ट केलं आहे. तेजस्वी यादव यांनी मात्र ही भूमिका योग्य नसल्याचे स्पष्टपणे म्हटलं आहे. खेळ आणि राजकारण यांची सांगड घालणे योग्य नसल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने विजयाच्या भावनेने पाकिस्तानचा दौरा करावा, असं तेजस्वी यादव म्हणाले. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाऊ शकतात, तर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात का जाऊ शकत नाही, असाही सवाल यादव यांनी केला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरु असलेल्या वादावर तेजस्वी यादवला माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "खेळ आणि राजकारण याला एकत्र करणं योग्य नाही. आपल्याला जायला हवं. इतर संघांनी भारतात यावे. ऑलिम्पिकमध्ये सगळेच सहभागी होत नाहीत का? भारताने पाकिस्तानात का जाऊ नये? आक्षेप काय आहे? पंतप्रधान तिथे बिर्याणी खायला जाऊ शकत असतील, तर भारतीय संघ जात असेल तर हे चांगले का नाही?," असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला.

भारताने पाकिस्तानात संघ पाठवण्यास नकार दिल्यानंतर या प्रतिक्रिया येत आहेत. आयसीसीसीने २९ नोव्हेंबर रोजी मोठ्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकारी सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीपूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी आयसीसीला सांगितले की ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडलचा स्वीकारणार नाहीत. तसेच पीसीबीने बैठकीत या पर्यायावर चर्चा न करण्यास सांगितले.

दरम्यान, पीसीबीने हायब्रीड मॉडेलला विरोध करत आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या मॉडेलचा अर्थ भारताला प्राधान्य देणे असल्याचे पीसीबीचे म्हणणं आहे. दुसरीकडे, भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणे शक्य नाही. भारताला या स्पर्धेतून वगळल्यास पाकिस्तानचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ