शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

PM मोदी जाऊ शकतात तर भारतीय संघ का नाही?; चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन तेजस्वी यादवांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:31 IST

भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी भाष्य केलं आहे.

Tejashwi Yadav: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यांच्यातील वादामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघालापाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुनच आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. शेजारी देशांत जाऊन क्रिकेट खेळण्यावर आक्षेप का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव हे देखील व्यावसायिक क्रिकेटपटू होते.

पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तानला जाणार नाही असे बीसीसीआयने आयसीसीला स्पष्ट केलं आहे. तेजस्वी यादव यांनी मात्र ही भूमिका योग्य नसल्याचे स्पष्टपणे म्हटलं आहे. खेळ आणि राजकारण यांची सांगड घालणे योग्य नसल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने विजयाच्या भावनेने पाकिस्तानचा दौरा करावा, असं तेजस्वी यादव म्हणाले. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाऊ शकतात, तर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात का जाऊ शकत नाही, असाही सवाल यादव यांनी केला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरु असलेल्या वादावर तेजस्वी यादवला माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "खेळ आणि राजकारण याला एकत्र करणं योग्य नाही. आपल्याला जायला हवं. इतर संघांनी भारतात यावे. ऑलिम्पिकमध्ये सगळेच सहभागी होत नाहीत का? भारताने पाकिस्तानात का जाऊ नये? आक्षेप काय आहे? पंतप्रधान तिथे बिर्याणी खायला जाऊ शकत असतील, तर भारतीय संघ जात असेल तर हे चांगले का नाही?," असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला.

भारताने पाकिस्तानात संघ पाठवण्यास नकार दिल्यानंतर या प्रतिक्रिया येत आहेत. आयसीसीसीने २९ नोव्हेंबर रोजी मोठ्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकारी सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीपूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी आयसीसीला सांगितले की ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडलचा स्वीकारणार नाहीत. तसेच पीसीबीने बैठकीत या पर्यायावर चर्चा न करण्यास सांगितले.

दरम्यान, पीसीबीने हायब्रीड मॉडेलला विरोध करत आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या मॉडेलचा अर्थ भारताला प्राधान्य देणे असल्याचे पीसीबीचे म्हणणं आहे. दुसरीकडे, भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणे शक्य नाही. भारताला या स्पर्धेतून वगळल्यास पाकिस्तानचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ