शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यास भारताने समुद्र मार्ग बंद करावा - सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:52 IST

हवाई हद्द बंद केल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देहवाई हद्द बंद केल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.भारताने अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी असा सल्ला देखील दिला आहे.सुब्रमण्यम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून याबाबत सल्ला दिला.

नवी दिल्ली - काश्मीरच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडलेला पाकिस्तान आता भारताला धमक्या देत आहे. पाकिस्ताननेभारतासाठी स्वतः ची हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्तानने ही हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भारतासाठी बंद केली आहे. परंतु पाकिस्तान ही हवाई हद्द भारतासाठी कायमस्वरूपी बंद करण्याच्या विचारात आहे. हवाई हद्द बंद केल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

'पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घालू शकतं तर भारताने देखील समुद्र मार्ग बंद करावा' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच भारताने अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी असा सल्ला देखील दिला आहे. सुब्रमण्यम यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून याबाबत सल्ला दिला आहे. 

'नमो सरकारला माझा सल्ला आहे की, भारतीय विमानांसाठी जर पाकिस्तान त्यांची हवाई हद्द बंद करू शकतं तर भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. याआधी काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार आहोत. दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती आहे आणि त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरीत्या भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानने भारतीय वायू सेनेला दिलेली परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानमधून अफगाणिस्तान येथे जाण्यास पाकिस्तान सरकारनं भारतीय एअर कंपन्यांना मज्जाव केला आहे.

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच सुरुवात मोदींनी केली होती, आता शेवट आम्ही करणार, असेही चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. भारतासाठी पाकिस्तानचे तात्पुरत्या स्वरूपात एअरस्पेस बंद केला आहे. तसेच भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील व्यापारी संबंधांनाही आळा घालण्याचा डाव पाकिस्तान सरकारचा आहे.  इम्रान यांच्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयावर भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे. कलम 370 हटविल्यानंतर लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. भारत सरकारने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानचा तिळपापड झाला असून पंतप्रधान इम्रान खानसह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत. 

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndiaभारत