शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Coronavirus : कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा होण्याची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 11:01 IST

तज्ज्ञांच्या अभ्यासातील निष्कर्ष : नंतर बाधा होण्याचे प्रमाण १.२ टक्के

ठळक मुद्देतज्ज्ञांच्या अभ्यासातील निष्कर्ष : नंतर बाधा होण्याचे प्रमाण १.२ टक्के

कोविड-१९ मधून बरे झालेल्या पुण्यातील एक हजारपेक्षा जास्त लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाची बाधा होण्याची शक्यता अगदीच विरळ असून त्यांची आजारानंतरची नैसर्गिक प्रतिकार शक्तीही खूप काळ टिकणारी असल्याचे सूचित होते.

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील साथरोग तज्ज्ञ आणि कम्युनिटी मेडिसीन तज्ज्ञांनी पुणे मेट्रोपोलिटन रिजनमध्ये राहणाऱ्या १,०८१ जणांचे सप्टेंबर २०२० पासून यावर्षी जूनपर्यंत संशोधन केले. या १,०८१ जणांनी सिरो सर्व्हेमध्ये सार्स-कोव्ह-२ अँटिबॉडीज दाखवली होती.

अभ्यास झालेल्या या १,०८१ जणांपैकी फक्त १३ जणांना अभ्यासाच्या नऊ महिन्यांत चाचणीत पुन्हा कोविडची बाधा झाली होती म्हणजेच पुन्हा बाधा होण्याचे प्रमाण होते १.२ टक्के, असे अभ्यासात आढळले. या १३ जणांमध्ये दुसऱ्यांदा झालेली कोविडची बाधा फारच साैम्य होती आणि ते पूर्णपणे बरेही झाले हे महत्वाचे. तज्ज्ञांचे म्हणणे असे की, ज्या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे आणि त्यावरील लसीची उपलब्धता मर्यादित आहे त्यांच्यासाठी अशा अभ्यासांचे परिणाम महत्वाचे आहेत. 

ज्यांना कोणाला अजून कोरोनाची बाधा झालेली नाही व जे नैसर्गिक प्रतिकार क्षमता नसलेले आहेत अशा लोकांना प्राधान्याने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस देऊन सरकार सामुहिक प्रतिकार शक्ती (हर्ड इम्युनिटी) किमान खर्चात प्राप्त करू शकते, असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे.

रांगेत शेवटी उभे राहाया अभ्यासाचा असाही निष्कर्ष आहे की, कोरोनाच्या नैसर्गिक संसर्गातून बरे झाल्यामुळे व त्याची पुन्हा बाधा होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ असल्यामुळे या लोकांनी लस घेण्यासाठीच्या रांगेत शेवटी उभे राहावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत