शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Video: गरज भासल्यास हातात शस्त्रं घेऊन संरक्षण करु; EVM संशयाचं रण पेटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 17:37 IST

एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे.

पटणा - लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधील आकडेवारीने राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे. बिहारच्या आघाडीमधील आरएलएसपीचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी जर ईव्हीएममध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही हातात शस्त्र घेऊ, मतांच्या रक्षणासाठी बलिदान देऊ असं विधान केल्याने खळबळ माजली आहे. 

यावेळी बोलताना उपेंद्र कुशवाहा म्हणाले की, ईव्हीएमबाबत छेडछाड करण्याचे प्रकार होत आहेत. जनतेमध्ये आक्रोश आहे. लोकांनी केलेलं मतदान लुटण्याचे काम केले जात आहे. जर जनतेची मते लुटली जात असतील गरज पडल्यास हाती शस्त्रे घेऊ असा इशारा त्यांनी दिला. तसेच वेळ पडली तर बिहारच्या जनतेनेही हातात हत्यार घेऊन संरक्षणासाठी घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. बिहार लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. नितीश कुमार यांच्यासाथीने भाजपा बिहारमध्ये निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एनडीएला बिहारमध्ये किमान 30 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी अशाप्रकारे वातावरण निर्मिती केली जात आहे. स्ट्राँगरुममधून ईव्हीएम खाजगी वाहनांमध्ये घालून कुठे नेतायेत? काय गडबड सुरु आहे असं राबडी देवी यांनी संशय व्यक्त केला. 

बिहारच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीत अनेक फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीत वेगळे लढल्याने त्यांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एनडीएने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पुढे केल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीएशी फारकत घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांची जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांची आरजेडी यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. पण आरजेडी-जेडीयू आघाडी फार काळ टिकली नाही त्यानंतर जेडीयूने पुन्हा भाजपाशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. यंदाच्या निवडणुकीत जेडीयू 17, भाजपा 17 जागांवर लढत आहे. त्यामुळे निकालांमध्ये भाजपाला किती यश मिळते हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीVotingमतदानBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019