शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे कोणाचा हात? अरविंद केजरीवाल यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 22:07 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस, भाजपवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसवर विरोधी पक्षांना कमजोर केल्याचा आरोप केला. जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्याला केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असणार असल्याचा आरोप केला. 

केजरीवाल यांनी सांगितले की, काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा महाआघाडी, केरळमध्ये डावे, बंगालमध्ये तृणमूल, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टी आणि दिल्लीमध्ये आपला कमजोर करण्याचे काम केले आहे. काँग्रेस होणारे काम बिघडवण्याचे काम करत आहे. या राज्यांत असे वाटत आहे की, काँग्रेस पक्ष भाजपा नाही तर विरोधी पक्षांविरोधात निवडणूक लढवत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली. 

केजरीवाल यांनी सांगितले की, मोदी कोणत्याही क्षेत्रात काहीही करण्यास अपयशी ठरले आहेत. यामुळे त्यांनी बनावट राष्ट्रवादाचे ढोंग रचले आहे. त्यांचा राष्ट्रवाद देशासाठी धोक्याचा आहे. मोदींपेक्षा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह 1000 पटींनी चांगले होते. मोदींकडे दाखवायला काही कामे नाहीत म्हणून मते मिळविण्यासाठी सैन्याचा वापर करत आहेत, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 

भाजपा आता सत्तेत येणार नाही. आमचा उद्देश मोदी आणि शहा यांना सत्तेत येण्यापासून रोखणे हा आहे. यासाठी आम्ही कोणालाही समर्थन देण्यास तयार आहोत. महिन्यापूर्वी वाटत होते की दिल्लीमध्ये कडवी टक्कर मिळेल. मात्र, 10 दिवसांत ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2015 सारखे वातावरण दिसत आहे. जेव्हा आणि दिल्लीमध्ये 67 जागा जिंकल्या होत्या. जर आम्ही सातही सीट जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

आप राज्यात केलेल्या कामांवर मते मागत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी