शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे कोणाचा हात? अरविंद केजरीवाल यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 22:07 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस, भाजपवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसवर विरोधी पक्षांना कमजोर केल्याचा आरोप केला. जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्याला केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असणार असल्याचा आरोप केला. 

केजरीवाल यांनी सांगितले की, काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा महाआघाडी, केरळमध्ये डावे, बंगालमध्ये तृणमूल, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टी आणि दिल्लीमध्ये आपला कमजोर करण्याचे काम केले आहे. काँग्रेस होणारे काम बिघडवण्याचे काम करत आहे. या राज्यांत असे वाटत आहे की, काँग्रेस पक्ष भाजपा नाही तर विरोधी पक्षांविरोधात निवडणूक लढवत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली. 

केजरीवाल यांनी सांगितले की, मोदी कोणत्याही क्षेत्रात काहीही करण्यास अपयशी ठरले आहेत. यामुळे त्यांनी बनावट राष्ट्रवादाचे ढोंग रचले आहे. त्यांचा राष्ट्रवाद देशासाठी धोक्याचा आहे. मोदींपेक्षा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह 1000 पटींनी चांगले होते. मोदींकडे दाखवायला काही कामे नाहीत म्हणून मते मिळविण्यासाठी सैन्याचा वापर करत आहेत, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 

भाजपा आता सत्तेत येणार नाही. आमचा उद्देश मोदी आणि शहा यांना सत्तेत येण्यापासून रोखणे हा आहे. यासाठी आम्ही कोणालाही समर्थन देण्यास तयार आहोत. महिन्यापूर्वी वाटत होते की दिल्लीमध्ये कडवी टक्कर मिळेल. मात्र, 10 दिवसांत ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2015 सारखे वातावरण दिसत आहे. जेव्हा आणि दिल्लीमध्ये 67 जागा जिंकल्या होत्या. जर आम्ही सातही सीट जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

आप राज्यात केलेल्या कामांवर मते मागत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी