शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला, तर देशात मोठी दरी निर्माण होईल': रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 12:25 IST

'देशाला हुकूमशाही नेतृत्वाची गरज नाही, लोकशाही आणि संस्था जितक्या मजबूत असतील तितका देश प्रगती करेल.'

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (raghuram rajan) यांनी देशातील अल्पसंख्याकांबाबत मोठे विधान केले आहे. शनिवारी छत्तीसगडमधील रायपूरमध्ये ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस (AIPC) तर्फे आयोजित 5व्या राष्ट्रीय कॉन्क्लेव्हला संबोधित करताना राजन म्हाले की, 'अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला गेला, तर देशात मोठी दरी निर्माण होईल', असे मत त्यांनी व्यक्त केले.

परकी हस्तक्षेप वाढेलराजन म्हणाले की, दोन समाजात दरी वाढली तर परकीय हस्तक्षेप वाढेल आणि यामुळे भारत कमकुवत होईल. यावेळी राजन यांनी आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या श्रीलंकेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले तर देशात रोजगार निर्माण होणार नाही आणि भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल. 

उदारमतवादी लोकशाही आवश्यक यावेळी राजन यांनी उदारमतवादी लोकशाहीचे फायदे सांगितले. आर्थिक प्रगतीसाठी लोकशाही उदारमतवादी असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. लोकशाही आणि संस्था जितक्या मजबूत असतील तितका देश प्रगती करेल. उदारमतवादाबद्दल ते म्हणाले की, याचा अर्थ कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. देशाला हुकूमशाही नेतृत्वाची गरज नाही, असे राजन म्हणाले. 

भारत आर्थिक सुधारणांच्या मार्गावर ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान आणि श्रीलंका या शेजारी देशांप्रमाणे भारतावर संकट येण्याची सध्या शक्यता नाही. परकीय चलन वाढीसाठी रिझर्व्ह बँकेने उचललेली पावले आणि महागाईबाबत योग्य दिशेने उचलण्यात येणारी पावले योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नुकत्याच परदेशात झालेल्या एका कार्यक्रमात रघुराम राजन यांनी सरकारला सुधारणांना गती देण्याचा सल्ला दिला होता. भारताने सुधारणांना गती दिली नाही तर आर्थिक विकासाचा वेग मंदावू शकतो. गती तेव्हाच वाढू शकते जेव्हा चांगल्या सुधारणा केल्या आहेत, असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक