शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
5
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
6
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
7
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
9
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
10
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
11
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
12
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
13
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
14
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
15
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
16
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
17
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
18
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
20
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार

"देशाला ग्लोबल पॉवर बनायचं असेल तर...", आनंद महिंद्रांनी घेतला IPS मनोज शर्मांचा ऑटोग्राफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:45 IST

महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनी IPS अधिकारी मनोज शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांची भेट घेतली

12th Fail या चित्रपटाने अनेकांना प्रेरणा दिली... मध्यप्रदेशमधील चंबल गावातून एक तरुण ज्याला IPS म्हणजे काय हेही माहीत नव्हते, पण एका पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून तो प्रेरित झाला आणि त्याने थेट ग्वालियर गाठलं.. पण, नियतिच्या मनात काही वेगळंच होतं... आजीने पेंशनचे साठवलेले पैसेही चोरीला गेले... मग तो तिथून दिल्लीत आणि अनेक अडचणींवर मात देत IPS अधिकारी झाला... मनोज कुमार यांची हा प्रवास जेव्हा रिअल लाईफवरून रिल लाईफवर आला, तेव्हा सर्व चकित झाले. आज महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनी IPS अधिकारी मनोज शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांची भेट घेतली.... त्यांनी खास ट्विट केले.

आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ''जेव्हा मी त्यांना त्यांचा ऑटोग्राफ मागितला, तेव्हा ते लाजले. जे मी तुम्हाला अभिमानाने दाखवत आहे. मनोज कुमार शर्मा, IPS आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी, IRS, हे खरे वास्तविक जीवनातील नायक आहेत. असाधारण जोडपे ज्यांच्या जीवनावर #12thFail हा चित्रपट आधारित आहे. ''

ते पुढे म्हणतात,''आज दुपारच्या जेवणाच्या वेळी, मला कळले की चित्रपटात जे दाखवले गेले हे त्यांच्या वास्तविक जीवनाशी तंतोतंत जुळत आहे आणि ते आजही अखंड सचोटीने जीवन जगण्याच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सराव करत राहतात. भारताला जागतिक महासत्ता बनवायचे असेल, तर अधिकाधिक लोकांनी त्यांच्या जीवनशैलीचा अवलंब केल्यास ते अधिक वेगाने होईल. त्यामुळे तेच या देशाचे खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांना भेटल्यामुळे मी आज एक श्रीमंत माणूस आहे.'' IPS मनोज कुमार शर्मा हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार नव्हते. आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या कुटुंबात त्यांचं पालनपोषण झालं. मनोज कुमार शर्मा यांचा हा प्रवास सोपा नव्हता. मनोज कुमार हे बारावी नापास झाले होते. इयत्ता नववी आणि दहावीमध्ये कसेबसे उत्तीर्ण झाले. बारावीत फक्त हिंदी या एकाच विषयात पास झाले होते. मात्र तरी देखील त्यांनी जीद्द सोडली नाही. 

मनोज यांना अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी काही काळ टेम्पो देखील चालवला. त्यांना रात्री झोपण्यासाठी जागा देखील मिळत नसे. त्यामुळे भिकाऱ्यांसोबत झोपण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एका वाचनालयात काम सुरू केलं. या काळात त्यांचा पुस्तकांशी जवळून संबंध आला. त्यांचा य़ेथेच मॅक्सिम गार्की, अब्राहन लिंकन यांच्या विचारांशी परिचय झाला. पुढे हेच त्यांना अत्यंत फायद्याचं ठरलं. मनोज कुमार शर्मा UPSC परीक्षेत तीन वेळा नापास झाले होते. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात 121 वा क्रमांक मिळवून तो आयपीएस अधिकारी झाले.  

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी