शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मी पंतप्रधान असतो तर नोटाबंदी प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 20:01 IST

मी जर पंतप्रधान असतो तर नोटाबंदीचा प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता.

नवी दिल्ली- मी जर पंतप्रधान असतो तर नोटाबंदीचा प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. मी पंतप्रधान असतो व नोटाबंदीच्या प्रस्तावाची फाईल माझ्याकडे आली असती तर तो प्रस्ताव सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकला असता, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा निशाणा साधला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या दक्षिण आशियातील देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी आज मलेशियापासून या दौऱ्याला सुरूवात केली असून त्यांनी आज कुआलालंपूरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं. या कार्यक्रमात राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही नोटाबंदीचा निर्णय वेगळ्या प्रकारे कसा लागू केला असता? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. नोटाबंदीचा निर्णय कुणासाठीही फायद्याचा नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. 

 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरून शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय लागू करत 500 व 1000 रूपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार केल्या होत्या. मोदींच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षाने सडकून टीका केली होती. 

मलेशियात झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. महिला सशक्तिकरणावर राहुल गांधी यांनी म्हंटलं, महिला सशक्तिकरणासाठी फक्त समानता पुरेशी नाही. महिलांप्रती ज्या प्रकारचा पक्षपात समाजात आहे तो दूर करण्यासाठी पुरूषांच्या मदतीची जास्त गरज आहे. मी महिलांना पुरूषांच्या बरोबर मानत नाही तर त्यांच्यापेक्षा वरचढ मानतो. पश्चिम समाजासह सगळ्याच समाजात महिलांबद्दल पक्षपाती व्यवहार केला जातो. हा विचार बदलण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदी