पाकिस्तानने फायरिंग केल्यास आपण किती गोळ्या फायर केल्या मोजत बसू नये - राजनाथ सिंग

By Admin | Updated: February 27, 2016 16:25 IST2016-02-27T16:25:11+5:302016-02-27T16:25:11+5:30

भारताकडून पाकिस्तानवर जेव्हा फायरिंग होत असेल तेव्हा आपल्याकडून किती गोळ्या झाडल्या गेल्या मोजत बसू नये असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे

If firing by Pakistan, you should not count on how many bullets fire - Rajnath Singh | पाकिस्तानने फायरिंग केल्यास आपण किती गोळ्या फायर केल्या मोजत बसू नये - राजनाथ सिंग

पाकिस्तानने फायरिंग केल्यास आपण किती गोळ्या फायर केल्या मोजत बसू नये - राजनाथ सिंग

>ऑनलाइन लोकमत - 
देहरादून, दि. 27 - भारताकडून पाकिस्तानवर जेव्हा फायरिंग होत असेल तेव्हा आपल्याकडून किती गोळ्या झाडल्या गेल्या मोजत बसू नये असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. मात्र भारताने पहिली गोळी झाडू नये असंही राजनाथ सिंग बोलले आहेत. 
 
'पहिली गोळी आपल्याकडून नाही चालली पाहिजे मात्र जर पाकिस्तान गोळ्या झाडत असेल तर आपल्याकडून किती झाडल्या गेल्या मोजत बसू नये' असं राजनाथ सिंग बोलले आहेत. उत्तराखंडमधील खटीमामध्ये रॅलीला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
यावेळी बोलसताना राजनाथ सिंग यांनी जेएनयूमधील देशद्रोहाच्या मुद्यावरदेखील भाष्य केलं. जर कोणी देशाविरोधात घोषणा देतं असेल तर ते सहन केलं जाणार नाही. आम्ही सर्व सहन करु शकतो मात्र 'हिंदुस्तान की बर्बादी' सारख्या घोषणा सहन नाही करु शकत.

Web Title: If firing by Pakistan, you should not count on how many bullets fire - Rajnath Singh