शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे मागे घेतले नाही, तर गोदामांना लक्ष्य करू; राकेश टिकैत यांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 15:05 IST

Farmers Protest: राकेश टिकैत (Rakesh Tikait) देशभरातील विविध राज्यांमध्ये जाऊन किसान महापंचायतींना संबोधित करीत आहेत.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्राला थेट इशारासरकारचे कायदे कॉर्पोरेटधार्जिणे असल्याचा आरोपकाही राज्यातील शेतकरी आंदोलने मीडिया दाखवत नसल्याचा आरोप

श्रीगंगानगर : गेल्या १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) देशभरातील विविध राज्यांमध्ये जाऊन किसान महापंचायतींना संबोधित करीत आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अन्यथा गोदामांना लक्ष्य करू, असा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्राला दिला आहे. (if farm laws not repealed then we will target corporate godowns rakesh tikait warns govt)

श्रीगंगानगर येथे संयुक्त किसना मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतीला संबोधित करण्यासाठी राकेश टिकैत गेले होते. काही खासगी कंपन्यांनी नवीन कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर गोदामे बांधण्यास सुरुवात केली आहे. अन्नधान्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर या कंपन्यांची गोदामे शेतकऱ्यांकडून लक्ष्य केली जातील, अशा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

“हमाम में सब नंगे होते है”; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

सरकारचे कायदे कॉर्पोरेटधार्जिणे

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बँका, विम्या कंपन्या आणि अन्य सरकारी उपक्रम खासगी कंपन्यांना विकण्याचा घाट घालत आहे. इतकेच नव्हे, तर आता असा कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे की, ज्यामुळे दूध, वीज, खते, बियाणे आणि मोटार वाहनांचे मार्केटिंग थेट खासगी कंपन्यांच्या हातात जाईल, असा दावा राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. 

तरुणांनी मोर्चाची कमान सांभाळावी

शेतकरी आंदोलनाची कमान आता तरुणांनी हातात घ्यावी. तसेच शेती आणि यासंबंधित स्वतःसाठी रोजगार तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन टिकैत यांनी केले आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि देशातील अन्य भागात सुरू असलेले शेतकरी आंदोलन मीडियाकडून दाखवले जात नाही, असा दावा टिकैत यांनी केला आहे. 

दरम्यान, गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहे. केंद्राने सर्व कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारशी अनेक बैठका होऊनही त्यातून अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. काही झाले, तरी कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांनी सुधारणा सूचवाव्यात. त्यानुसार कायद्यात दुरुस्ती केली जाईल, यावर केंद्र सरकार ठाम आहे. सरकारकडून चर्चेची द्वारे अद्यापही खुली आहेत. शेतकरी नेते, प्रतिनिधींनी चर्चेसाठी यावे, असे आवाहनही अनेकदा करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतRajasthanराजस्थानCentral Governmentकेंद्र सरकार