शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे मागे घेतले नाही, तर गोदामांना लक्ष्य करू; राकेश टिकैत यांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 15:05 IST

Farmers Protest: राकेश टिकैत (Rakesh Tikait) देशभरातील विविध राज्यांमध्ये जाऊन किसान महापंचायतींना संबोधित करीत आहेत.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्राला थेट इशारासरकारचे कायदे कॉर्पोरेटधार्जिणे असल्याचा आरोपकाही राज्यातील शेतकरी आंदोलने मीडिया दाखवत नसल्याचा आरोप

श्रीगंगानगर : गेल्या १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) देशभरातील विविध राज्यांमध्ये जाऊन किसान महापंचायतींना संबोधित करीत आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अन्यथा गोदामांना लक्ष्य करू, असा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्राला दिला आहे. (if farm laws not repealed then we will target corporate godowns rakesh tikait warns govt)

श्रीगंगानगर येथे संयुक्त किसना मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतीला संबोधित करण्यासाठी राकेश टिकैत गेले होते. काही खासगी कंपन्यांनी नवीन कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर गोदामे बांधण्यास सुरुवात केली आहे. अन्नधान्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर या कंपन्यांची गोदामे शेतकऱ्यांकडून लक्ष्य केली जातील, अशा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

“हमाम में सब नंगे होते है”; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

सरकारचे कायदे कॉर्पोरेटधार्जिणे

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बँका, विम्या कंपन्या आणि अन्य सरकारी उपक्रम खासगी कंपन्यांना विकण्याचा घाट घालत आहे. इतकेच नव्हे, तर आता असा कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे की, ज्यामुळे दूध, वीज, खते, बियाणे आणि मोटार वाहनांचे मार्केटिंग थेट खासगी कंपन्यांच्या हातात जाईल, असा दावा राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. 

तरुणांनी मोर्चाची कमान सांभाळावी

शेतकरी आंदोलनाची कमान आता तरुणांनी हातात घ्यावी. तसेच शेती आणि यासंबंधित स्वतःसाठी रोजगार तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन टिकैत यांनी केले आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि देशातील अन्य भागात सुरू असलेले शेतकरी आंदोलन मीडियाकडून दाखवले जात नाही, असा दावा टिकैत यांनी केला आहे. 

दरम्यान, गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहे. केंद्राने सर्व कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारशी अनेक बैठका होऊनही त्यातून अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. काही झाले, तरी कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांनी सुधारणा सूचवाव्यात. त्यानुसार कायद्यात दुरुस्ती केली जाईल, यावर केंद्र सरकार ठाम आहे. सरकारकडून चर्चेची द्वारे अद्यापही खुली आहेत. शेतकरी नेते, प्रतिनिधींनी चर्चेसाठी यावे, असे आवाहनही अनेकदा करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतRajasthanराजस्थानCentral Governmentकेंद्र सरकार