शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

काँग्रेसच्या जागांनी शंभरी पार न केल्यास राहुल यांच्या नेतृत्व पुन्हा प्रश्नचिन्ह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 16:06 IST

गेल्या दिड वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाची धूरा राहुल गांधी यांच्या हातात आहे. मागील 5 राज्यातील निवडणुकांनतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेलं यश वाखणण्याजोगे होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला अपेक्षित जागा मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत जर काँग्रेसला प्रत्यक्ष निकालात 100 जागा मिळाल्या नाही तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद मिळवितानाही काँग्रेसला अडचण निर्माण झाली होती. फक्त 44 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं होतं. 

गेल्या दिड वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाची धूरा राहुल गांधी यांच्या हातात आहे. मागील 5 राज्यातील निवडणुकांनतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेलं यश वाखणण्याजोगे होते. त्यानंतर झालेल्या या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. निवडणुकपूर्व केलेल्या सर्व्हेक्षणामधून काँग्रेसला सहजासहजी केंद्रात सत्ता मिळविता येणार नाही. त्यामुळे 100 जागांचा आकडा पार करणे काँग्रेससाठी गरजेचे आहे अन्यथा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. मागील 5 वर्ष काँग्रेसने अनेक निवडणुकीत पराभवाचा सामना केला आहे. पण छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सुधारली.या राज्यात सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आलं. काँग्रेसच्या यशाचा हा आलेख यंदाच्या निवडणुकीत राखणं काँग्रेससाठी आव्हान बनलं होतं. 

दरम्यान काँग्रेसची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी राहील. राहुल गांधी यांनी सामान्य गरिबांचा आवाज बुलंद केला आहे. राहुल गांधी यांची मेहनत आणि प्रयत्न या निवडणुकीत दिसलं आहे. त्याचे परिणाम निश्चित निकालात दिसतील असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत.     

17व्या लोकसभेसाठी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा रविवारी शांत झाला. सातव्या टप्प्यात 19 मे रोजी 59 जागांवर मतदान झालं असून, तत्पूर्वीच देशात कोणाचं सरकार येणार? यूपीए की एनडीए कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. सरकार कोणाचं बनणार आणि देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस