शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

सरकार बनल्यास शेतकऱ्यांना दहा दिवसांत देऊ कर्जमाफी, राहुल गांधींचे वचन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 16:25 IST

ज्या दिवशी काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे वचन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले...

मंदसौर  - ज्या दिवशी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे वचन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदसौर येथे शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करताना दिले.   मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या पहिल्या स्मृतिदिनी राहुल गांधी उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शेतकऱ्यांना न्याय आणि कर्जमाफीसारख्या विषयांना हात घालत या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले. मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोड रुपयांचे कर्ज माफ होते. मात्र शेतकऱ्यांना एका रुपयाचीही माफी मिळत नाही, अशी टीका करत राहुल गांधींनी ज्या दिवशी राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे वचन दिले.शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मंदसौर येथे झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना आपले सरकार आल्यानंतर दहा दिवसांच्या आत न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.  शिवराज सरकारमध्ये शेतकऱ्यांना बाजारात चेक मिळतो आणि बँकेत त्यांच्याकडून लाच घेतली जाते. मात्र काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यांना थेट बाजारातच पैसे दिले जातील. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून स्थानिकांना रोजगार दिला जाईल,  असे राहुल गांधींनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना सत्तेवर येताना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीPoliticsराजकारण