शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

''भाजपा कधी वाजपेयी-अडवाणींची नव्हती; तर मोदी-शहांची कशी होईल''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 22:54 IST

भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा व्यक्ती केंद्रीत पक्ष असल्याचे आरोप फेटाळले आहेत.

नवी दिल्ली : भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा व्यक्ती केंद्रीत पक्ष असल्याचे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी भाजपा कधीही व्यक्ती केंद्रीत पक्ष नव्हता तर तो विचारधारेवर आधारित पक्ष होता असे म्हटले आहे. 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यावर भाष्य केले आहे. भाजपा हा केवळ अटलबिहारी वाजपेयी यांचा कधी बनला नाही, ना ही केवळ अडवाणींचा बनला. यामुळे हा पक्ष कधीही केवळ मोदी-शहा यांचा बनू शकत नाही. हा पक्ष विचारधारेवर आधारित आहे. यामुळे व्यक्तीकेंद्रीत पक्ष आहे हे म्हणणे चुकीचे असल्याचे गडकरी म्हणाले. मात्र, भाजपा आणि मोदी एकमेकांना पुरक असल्याचे त्यांनी पुढे जोडले आहे. 

1976 मध्ये काँग्रेसमध्ये 'इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा' अशा घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे भाजपा हीच मोदी आणि मोदी म्हणजेच भाजपा, अशी बनली आहे का या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले आहे. 

एखादा ताकदवर पक्षही कमजोर नेत्याच्या नेतृत्वात जिंकू शकत नाही. भाजपामध्ये कोणत्याही कुटुंबाचे राज्य चालू शकत नाही. सरकारमध्ये सर्व निर्णय संसदीय मंडळ घेते. तसेच नेता मजबूत असेल आणि पक्ष कमजोर असेल तरीही तो पक्ष जिंकू शकत नसल्याचे गडकरी म्हणाले. परंतू, लोकप्रिय नेत्याला पुढे यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. 

भाजपा विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार आहे, असे सांगताना गडकरी यांनी राष्ट्रवादाची ढाल केल्याचा आरोप फेटाळून लावला. मात्र, राष्ट्रवाद हा भाजपासाठी मुद्दा नसून आत्मा असल्याचेही ते म्हणाले. तसेच भाजपाला बहुमत मिळणार नसल्याच्या बातम्यांचे त्यांनी खंडन केले. भाजपा 2014 पेक्षाही जास्त जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक