शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

कुणी नाव विचारलं तर रंगा-बिल्ला आणि पत्ता 7 रेसकोर्स सांगा! एनआरसीवरून अरुंधती रॉय यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 19:59 IST

आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अरुंधती रॉय उपस्थित होत्या.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेला सीएए कायदा आणि प्रस्तावित एनआरसीच्या मुद्द्यावरून सामाजिका कार्यकर्त्या आणि लेखिका अरुंधती रॉय यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.  देशातील डिटेंशन कॅम्पबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. एनपीआरसुद्धा एनआरसीचाच भाग आहे. त्यामुळे जेव्हा एनपीआरसाठी सरकारी कर्मचारी माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचे नाव रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला असल्याचे सांगा. तसेच घराचा पत्ता देण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता द्या, असा सल्ला अरुंधती रॉय यांवी दिला आहे. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अरुंधती रॉय उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत अभिनेते जिशान अय्यूब आणि अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमारसुद्धा उपस्थित होते.  यावेळी अरुंधती रॉय म्हणाल्या की, ''देशातील डिटेंशन कॅम्पबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा याबाबत देशासमोर चुकीची माहिती मांडली आहे. जेव्हा महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी सरकारविरोधात आवाज उठवतात तेव्हा त्यांना शहरी नक्षलवादी म्हणून हिणवले जाते.'' ''एनपीआरसुद्धा एनआरसीचाच भाग आहे. त्यामुळे जेव्हा एनपीआरसाठी सरकारी कर्मचारी माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचे नाव रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला असल्याचे सांगा. तसेच घराचा पत्ता देण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता लिहून द्या,'' सल्लाही अरुंधती रॉय यांनी दिला. ''त्तर भारतात जेव्हा जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते. तेव्हा तेथील माता भगिनी आपल्या मुलांच्या आधी आपली कागदपत्रे वाचवतात. कारण त्यांना माहिती आहे की जर कागदपत्रे वाहून गेली तर त्यांचे येथे राहणेसुद्धा कठीण होऊन जाईल,''असा टोलाही अरुंधती रॉय यांनी लगावला. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण