शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कुणी नाव विचारलं तर रंगा-बिल्ला आणि पत्ता 7 रेसकोर्स सांगा! एनआरसीवरून अरुंधती रॉय यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 19:59 IST

आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अरुंधती रॉय उपस्थित होत्या.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेला सीएए कायदा आणि प्रस्तावित एनआरसीच्या मुद्द्यावरून सामाजिका कार्यकर्त्या आणि लेखिका अरुंधती रॉय यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.  देशातील डिटेंशन कॅम्पबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. एनपीआरसुद्धा एनआरसीचाच भाग आहे. त्यामुळे जेव्हा एनपीआरसाठी सरकारी कर्मचारी माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचे नाव रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला असल्याचे सांगा. तसेच घराचा पत्ता देण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता द्या, असा सल्ला अरुंधती रॉय यांवी दिला आहे. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अरुंधती रॉय उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत अभिनेते जिशान अय्यूब आणि अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमारसुद्धा उपस्थित होते.  यावेळी अरुंधती रॉय म्हणाल्या की, ''देशातील डिटेंशन कॅम्पबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा याबाबत देशासमोर चुकीची माहिती मांडली आहे. जेव्हा महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी सरकारविरोधात आवाज उठवतात तेव्हा त्यांना शहरी नक्षलवादी म्हणून हिणवले जाते.'' ''एनपीआरसुद्धा एनआरसीचाच भाग आहे. त्यामुळे जेव्हा एनपीआरसाठी सरकारी कर्मचारी माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचे नाव रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला असल्याचे सांगा. तसेच घराचा पत्ता देण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता लिहून द्या,'' सल्लाही अरुंधती रॉय यांनी दिला. ''त्तर भारतात जेव्हा जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते. तेव्हा तेथील माता भगिनी आपल्या मुलांच्या आधी आपली कागदपत्रे वाचवतात. कारण त्यांना माहिती आहे की जर कागदपत्रे वाहून गेली तर त्यांचे येथे राहणेसुद्धा कठीण होऊन जाईल,''असा टोलाही अरुंधती रॉय यांनी लगावला. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण