शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:44 IST

PM Modi Bihar Visit: भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई शेवटपर्यंत पोहोचवायची असेल, तर कोणालाही कारवाईपासून वाचवता कामा नये.

PM Modi Bihar Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२२ ऑगस्ट २०२५) बिहार दौऱ्यातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली ३० दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान-मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना त्यांच्या पदावरुन काढून टाकणाऱ्या नवीन विधेयकावरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "एनडीए सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध असा कायदा आणला आहे, ज्याच्या कक्षेत देशाचे पंतप्रधान देखील येतात. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही या कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहे."

...तर पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना पद सोडावे लागेलपंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, "हा कायदा तयार झाल्यानंतर कोणत्याही मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधानांना अटक झाली तर त्यांना ३० दिवसांच्या आत जामीन मिळवावा लागेल आणि जर जामीन मंजूर झाला नाही, तर त्यांना ३१ व्या दिवशी पद सोडावे लागेल. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवायची असेल, तर कोणालाही कारवाईपासून वाचवता कामा नये, असे मला स्पष्टपणे वाटते."

जर एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केले जाऊ शकते, तर पंतप्रधानांना का नाही?नवीन कायद्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा कायदा असा आहे की, जर एखाद्या लहान सरकारी कर्मचाऱ्याला ५० तास कोठडीत ठेवले, तर तो आपोआप निलंबित होतो, परंतु मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधान तुरुंगात असतानाही सत्तेचा आनंद घेऊ शकतो. हा नियम पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना का लागू होऊ नये? आम्ही काही काळापूर्वी पाहिले की, तुरुंगातूनच फायलींवर स्वाक्षरी केली जात होती. तुरुंगातूनच सरकारी आदेश जारी केले जात होते. जर नेत्यांची ही वृत्ती असेल, तर भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कशी लढता येईल?"

राजद-काँग्रेसने जनतेला लुटले - पंतप्रधान मोदीपंतप्रधान मोदींनी राजद आणि काँग्रेसवर जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "काँग्रेस असो वा राजद सरकार, त्यांना कधीच जनतेच्या पैशाचे मूल्य समजले नाही. त्यांच्यासाठी जनतेचा पैसा म्हणजे फक्त त्यांची तिजोरी भरणे आहे. म्हणूनच त्यांच्या सरकारच्या काळात वर्षानुवर्षे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. प्रकल्प जितका जास्त प्रलंबित, तितका जास्त पैसा त्यांना त्यातून मिळायचा. इतक्या वर्षांत आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. मात्र, स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारांकडे त्यांच्या भ्रष्टाचाराची मोठी यादी आहे. बिहारमधील प्रत्येक मुलाला राजदच्या भ्रष्टाचाराची माहिती आहे," अशी टीकाही पीएम मोदींनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारcongressकाँग्रेसBJPभाजपा