शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
4
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
5
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
6
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
7
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
8
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
9
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
10
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
11
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
12
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
13
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
14
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
15
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
16
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
17
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
18
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
19
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
20
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 

'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:44 IST

PM Modi Bihar Visit: भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई शेवटपर्यंत पोहोचवायची असेल, तर कोणालाही कारवाईपासून वाचवता कामा नये.

PM Modi Bihar Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२२ ऑगस्ट २०२५) बिहार दौऱ्यातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली ३० दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान-मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना त्यांच्या पदावरुन काढून टाकणाऱ्या नवीन विधेयकावरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "एनडीए सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध असा कायदा आणला आहे, ज्याच्या कक्षेत देशाचे पंतप्रधान देखील येतात. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही या कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहे."

...तर पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना पद सोडावे लागेलपंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, "हा कायदा तयार झाल्यानंतर कोणत्याही मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधानांना अटक झाली तर त्यांना ३० दिवसांच्या आत जामीन मिळवावा लागेल आणि जर जामीन मंजूर झाला नाही, तर त्यांना ३१ व्या दिवशी पद सोडावे लागेल. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवायची असेल, तर कोणालाही कारवाईपासून वाचवता कामा नये, असे मला स्पष्टपणे वाटते."

जर एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केले जाऊ शकते, तर पंतप्रधानांना का नाही?नवीन कायद्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा कायदा असा आहे की, जर एखाद्या लहान सरकारी कर्मचाऱ्याला ५० तास कोठडीत ठेवले, तर तो आपोआप निलंबित होतो, परंतु मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधान तुरुंगात असतानाही सत्तेचा आनंद घेऊ शकतो. हा नियम पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना का लागू होऊ नये? आम्ही काही काळापूर्वी पाहिले की, तुरुंगातूनच फायलींवर स्वाक्षरी केली जात होती. तुरुंगातूनच सरकारी आदेश जारी केले जात होते. जर नेत्यांची ही वृत्ती असेल, तर भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कशी लढता येईल?"

राजद-काँग्रेसने जनतेला लुटले - पंतप्रधान मोदीपंतप्रधान मोदींनी राजद आणि काँग्रेसवर जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "काँग्रेस असो वा राजद सरकार, त्यांना कधीच जनतेच्या पैशाचे मूल्य समजले नाही. त्यांच्यासाठी जनतेचा पैसा म्हणजे फक्त त्यांची तिजोरी भरणे आहे. म्हणूनच त्यांच्या सरकारच्या काळात वर्षानुवर्षे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. प्रकल्प जितका जास्त प्रलंबित, तितका जास्त पैसा त्यांना त्यातून मिळायचा. इतक्या वर्षांत आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. मात्र, स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारांकडे त्यांच्या भ्रष्टाचाराची मोठी यादी आहे. बिहारमधील प्रत्येक मुलाला राजदच्या भ्रष्टाचाराची माहिती आहे," अशी टीकाही पीएम मोदींनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारcongressकाँग्रेसBJPभाजपा