शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 11:49 IST

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची पाहणी करायला जात असताना त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही.

नवी दिल्लीः भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) अधिकारी सुभान अली 22 जूनपासून बेपत्ता झाले आहेत. ते सीमा रस्ते संघटनेत अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांची तैनाती लेह आणि कारगिलमध्ये करण्यात आली होती. 22 जून रोजी ते लान्सनायक पलविंदर सिंग यांच्यासमवेत भारत-चीन सीमेवर बांधल्या जात असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी  गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची पाहणी करायला जात असताना त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत त्यांचा मृतदेहसुद्धा सापडलेला नाही. त्यांचे कुटुंबीय त्यांची वाट पाहत आहेत. उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी सुभानचे कुटुंब खूपच अस्वस्थ आहे. ते प्रत्येक क्षणी भयंकर यातनांमधून जात आहेत. सुभान या जगात नाही, यावर त्यांचा विश्वास नाही. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असेल तर सरकारने त्यांचा मृतदेह आणावा, जेणेकरून आमच्या लोकांना खात्री पटेल, असे या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. जोपर्यंत ते जिवंत किंवा त्यांचा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत ते जिवंत असल्याचंच आम्ही समजू.सरकारच्या प्रयत्नांनी असमाधानीसुभानचे वडील रमझान अली यांनी आरोप केला की, सरकार सुभानला शोधण्यासाठी पुरेसे उपाय करीत नाही. केंद्र सरकारच्या प्रयत्नावर ते समाधानी नाहीत. या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रमजान अली म्हणतात की, जोपर्यंत ते आपल्या मुलाला जिवंत किंवा मृतदेह पाहत नाही, तोपर्यंत त्याचा श्वास अडकलेल्या अवस्थेत राहील. भावानं एनडीआरएफवर उपस्थित केले प्रश्नसुभानचा भाऊ शबन अली यांनी सांगितले की, सैन्य आणि लेह प्रशासन एकत्रितपणे 60 किमीच्या परिघात आपल्या भावाचा मृतदेह शोधू शकलेले नाहीत. ते म्हणाले की, जेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते लेह येथे गेले होते. एनडीआरएफच्या अधिका-यांची तिथे भेट घेतली. अधिका -यांनी त्यांना सांगितले की, अतिशीत तापमानात त्यांचा मृतदेह पाण्यात सापडणे फार कठीण जात आहे. एनडीआरएफ कठीण काळात काम करू शकत नसेल तर त्यांचा काय उपयोग?, असंही ते म्हणाले आहेत. सुभान अली कोण आहेत?बलरामपूरमधील जयनगर या छोट्याशा गावात राहणारे सुभान यांनी आयआयटी दिल्लीमधून इंजिनीअरिंग केले. IES प्रवेश परीक्षेत त्यांना भारतात 24वे स्थान मिळाले. 2018 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये एमटेक केले. त्यांना दिल्ली विकास प्राधिकरणात पोस्ट करण्यात आले होते. एप्रिलमध्ये त्यांना कारगिल भागात पाठवण्यात आले होते. ते येथील भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या बांधकामांचे काम पाहात होते.

हेही वाचा

रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं

जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...  

उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना