शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी कमलनाथ सरकारची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 16:19 IST

राज्यपालांनी तातडीने फ्लोरटेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता काय निर्णय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र कमलनाथ यांनी देखील प्लॅन बी कायम ठेवला आहे.

नवी दिल्ली -मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारने काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या आमदारांची अनेक दिवसांची मागणी मान्य करत राज्यात तीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यास मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.

कमलनाथ सरकारच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे. नवीन जिल्हा निर्मितीच्या सरकारच्या निर्णयात चाचौडा, नागदा आणि मेहर या शहरांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंडखोर आमदार नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी आग्रही होती. भाजपवर नाराज असलेले आमदार नारायण त्रिपाठी गेल्या अनेक वर्षांपासून मेहरला (सतना) ला जिल्हा बनविण्यासाठी आग्रही होते. मतदार संघात जे विकासावर बोलतील त्याच्यासोबतच राहु अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

या व्यतिरिक्त दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह हे चौपाडा (गुना) शहराला जिल्हा करण्याची मागणी करत होते. या मुद्दावरून त्यांनी काँग्रेसला अनेकदा घरचा आहेर दिला होता. तर नागदाला (उज्जेन) जिल्हा बनवून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिलीप सिंह गुर्जर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे किती आमदार काँग्रेसमध्ये परत येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

तब्बल 22 आमदारांनी राजीनामा देत बंगळुरू गाठल्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमतात गेले आहे. त्यातच राज्यपालांनी तातडीने फ्लोरटेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता काय निर्णय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र कमलनाथ यांनी देखील प्लॅन बी कायम ठेवला आहे.