शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ICMR Chief epidemiologist on Coronavirus : नव्या स्ट्रेनमुळे घाबरण्याचं कारण नाही, आणखी म्युटेशन येत राहणार - आयसीएमआर तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 09:24 IST

Conavirus ICMR Chief epidemiologist : या प्रकारचे अनेक व्हेरिअंट येत राहणार, त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं ICMR चे चीफ एपिडेमोलॉजिस्ट डॉक्टर समीरन पांडा यांची माहिती.

ICMR Chief epidemiologist on Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनमुळे (omicron variant) सध्या देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही देशांनी नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, डॉ. समीरन पांडा यांनी सतर्क राहणं आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

"जगात कोणत्याही प्रकारची महासाथ येते तेव्हा विशेषकरून विषाणू हहा त्याचं स्वरूप बदलत असतो. कोरोना विषाणूच्या बाबतीतही अगदी तिच स्थिती आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये याचे आणखीही म्युटेंट समोर येतील. यामुळेच आपल्याला घाबरण्याचं कारण नाही, आपल्याला यापासून बचाव करायचा आहे," असं पांडा म्हणाले. अमर उजालाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर वक्तव्य केलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्वात चांगला आणि उत्तम उपाय म्हणजे त्यासाठी ज्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात, त्याचं पालन करणं हाच आहे. लसीकरण, मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, हात धुणं, सॅनिटायझरचा वापर अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे. जर अशा गोष्टींचा दिनचर्येत वापर केला तर केवळ कोरोना विषाणूच नाही, तर अन्य गोष्टींपासूनही बचाव होईल. कोणत्याही गोष्टींना घाबरण्यापेक्षा त्याच्यापासून बचावासाठी असलेल्या उपायांचा वापरच उत्तम ठरणार असल्याचं ते म्हणाले.

सतर्क राहण्याची गरज"जगातील निरनिराळ्या देशांमध्ये कोरोना विषाणूचं बदलतं रुप समोर येत आहे. विशेषकरून ज्यांचा प्रसार अचानक तेजीनं होतो किंवा जे अधिक गंभीर आहेत. त्याच्यापासून निश्चितच आपल्याला अलर्ट राहायला हवं, त्या दिशेनं केंद्रानं अॅडव्हायझरीच्या रुपात पाऊल उचललं आहे. आपल्याला या प्रकरणी अलर्ट राहण्याची गरज आहे," असं डॉ. पांडा म्हणाले. राज्यांमध्ये ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि सँपलिंग सातत्यानं करत राहावं, यासंदर्भात राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे आपण योग्य दिशेनं न केवळ प्रकरणांची तपासणी करू शकतो, तर यामुळे आपल्या संसर्गही रोखता येईल. परंतु सध्या महासाथ वाढण्याच्या दृष्टीनं आपल्या देशात कोणतेही संकेत मिळाले नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत