शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

IAS Keerthi Jalli : कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS बोटीतून गावात पोहोचल्या; चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 15:44 IST

IAS Keerthi Jalli : महिला अधिकारी पुरग्रस्त भागात पूर्ण निष्ठेसह आपलं काम करत आहेत आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलातून वाट काढत आहेत.

नवी दिल्ली - आसाममध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. ASDMA ने सांगितलं की, सध्या 956 गावे पाण्याखाली गेली आहेत आणि संपूर्णआसाममध्ये 47,139.12 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अधिकारी सहा जिल्ह्यांमध्ये 365 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत. जिथे 13,988 मुलांसह 66,836 लोक आश्रयस्थानात आहेत. आतापर्यंत 1,243.65 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 5,075.11 लीटर मोहरीचे तेल, 300 क्विंटल पशुखाद्य आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप करण्यात आलं आहे. याच दरम्यान एका महिला IAS अधिकाऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

कार्यालयात बसून बैठका घेण्याऐवजी महिला IAS अधिकारी बोटीतून गावात पोहोचल्या. चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सर्वांनीच सलाम केला आहे. कीर्ती जल्ली (Keerthi Jalli) असं या महिला IAS अधिकाऱ्याचं नाव आहे. या महिला अधिकारी पुरग्रस्त भागात पूर्ण निष्ठेसह आपलं काम करत आहेत आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलातून वाट काढत आहेत. चिखलाने साडी भरलेल्या या महिला अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कीर्ती जल्ली सध्या आसाममधील कचार जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. 

कचार जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील त्यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूरग्रस्तांपर्यंत पोहोचून सर्वतोपरी मदत केल्याबद्दल या महिला अधिकाऱ्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. "स्थानिक लोकांनी सांगितलं की ते गेल्या 50 वर्षांपासून याच समस्येचा सामना करत आहेत. मला वाटलं की मला तिथे जाऊन वास्तविक समस्या पाहण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी त्याठिकाणी पाहणी करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पूर आलेला असतानाचा काळ" असं कीर्ती यांनी म्हटलं आहे. तसेच भविष्यात होणारं नुकसान कमी करता यावं, यासाठी गावाच्या सुरक्षेवर भर देणार असल्याचं उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितलं. 

जिल्ह्यातील उपायुक्त त्यांच्या गावी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. बराक नदीला आलेल्या पुरामुळे दरवर्षी येणाऱ्या समस्या त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आसाममध्ये (Assam) पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत लाखो लोकं प्रभावित होत आहे. गुरुवारी पावसाशी संबंधित घटनेत आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी सरकारी आकडेवारीनुसार, 5.61 लाख लोक अजूनही पूरासारख्या परिस्थितीचा सामना करत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, गुरुवारी नगाव आणि कामपूर येथे प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला. 

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामfloodपूर