शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

IAS Keerthi Jalli : कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS बोटीतून गावात पोहोचल्या; चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 15:44 IST

IAS Keerthi Jalli : महिला अधिकारी पुरग्रस्त भागात पूर्ण निष्ठेसह आपलं काम करत आहेत आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलातून वाट काढत आहेत.

नवी दिल्ली - आसाममध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. ASDMA ने सांगितलं की, सध्या 956 गावे पाण्याखाली गेली आहेत आणि संपूर्णआसाममध्ये 47,139.12 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अधिकारी सहा जिल्ह्यांमध्ये 365 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत. जिथे 13,988 मुलांसह 66,836 लोक आश्रयस्थानात आहेत. आतापर्यंत 1,243.65 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 5,075.11 लीटर मोहरीचे तेल, 300 क्विंटल पशुखाद्य आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप करण्यात आलं आहे. याच दरम्यान एका महिला IAS अधिकाऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

कार्यालयात बसून बैठका घेण्याऐवजी महिला IAS अधिकारी बोटीतून गावात पोहोचल्या. चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सर्वांनीच सलाम केला आहे. कीर्ती जल्ली (Keerthi Jalli) असं या महिला IAS अधिकाऱ्याचं नाव आहे. या महिला अधिकारी पुरग्रस्त भागात पूर्ण निष्ठेसह आपलं काम करत आहेत आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलातून वाट काढत आहेत. चिखलाने साडी भरलेल्या या महिला अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कीर्ती जल्ली सध्या आसाममधील कचार जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. 

कचार जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील त्यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूरग्रस्तांपर्यंत पोहोचून सर्वतोपरी मदत केल्याबद्दल या महिला अधिकाऱ्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. "स्थानिक लोकांनी सांगितलं की ते गेल्या 50 वर्षांपासून याच समस्येचा सामना करत आहेत. मला वाटलं की मला तिथे जाऊन वास्तविक समस्या पाहण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी त्याठिकाणी पाहणी करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पूर आलेला असतानाचा काळ" असं कीर्ती यांनी म्हटलं आहे. तसेच भविष्यात होणारं नुकसान कमी करता यावं, यासाठी गावाच्या सुरक्षेवर भर देणार असल्याचं उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितलं. 

जिल्ह्यातील उपायुक्त त्यांच्या गावी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. बराक नदीला आलेल्या पुरामुळे दरवर्षी येणाऱ्या समस्या त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आसाममध्ये (Assam) पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत लाखो लोकं प्रभावित होत आहे. गुरुवारी पावसाशी संबंधित घटनेत आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी सरकारी आकडेवारीनुसार, 5.61 लाख लोक अजूनही पूरासारख्या परिस्थितीचा सामना करत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, गुरुवारी नगाव आणि कामपूर येथे प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला. 

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामfloodपूर