शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तळघरात स्टोअरला होती परवानगी, पण लायब्ररी सुरू होती; अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 10:44 IST

काल दिल्लीत इमारतीत घुसलेल्या पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली, एका आयएएस अॅकडमीमधील तळघरात पाणी घुसल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

काल दिल्लीतील राव आयएएस स्टडी सर्कल या कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने शनिवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थिनी आणि एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी पोलिसांनी संस्थेचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंह यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कलमान्वये इमारत व्यवस्थापन आणि ड्रेनेज व्यवस्थेची देखभाल करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोचिंग सेंटर सील करण्यात आले आहे.

कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षासाठी ठरल्या 'लक्ष्मी'; एका आठवड्यात निवडणूक प्रचारातून २०० मिलियन डॉलर्स केले जमा

या घटनेवर दिल्लीचे राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी विभागीय आयुक्तांना मंगळवारपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एलजी म्हणाले की, जे काही घडत आहे ते अक्षम्य आहे आणि अशा समस्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुरक्षेची खात्री न करण्यामध्ये कोचिंग संस्था आणि जमीनदारांच्या भूमिकेचीही त्यांनी चौकशी केली.

दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात तान्या या विद्यार्थिनीची ओळख पटली. ती मूळची बिहारच्या औरंगाबादची. तिचे वडील तेलंगणात अभियंता आहेत.

रवींद्र सिंह यादव यांनी सांगितले की, रविवारी एफएसएल टीमने कोचिंग सेंटरमधून पुरावे गोळा केले आणि ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले. तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात पुष्टी झाली आहे.

सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाच फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यावेळी कोचिंग सेंटरच्या तळघरात सुमारे ३५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास काही मोठ्या वाहनांनी रस्त्यावर यू-टर्न घेतला असता तळघराच्या पायऱ्यांवरील काचेचा दरवाजा पाण्याच्या दाबाने तुटल्याने काही मिनिटांतच ही जागा पाण्याने भरून गेली. 

पाणी पाहून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ सुरू झाला

अचानक तळघरात पाणी आल्याने शॉर्टसर्किटमुळे वीजही गेली. दोन विद्यार्थिनी आणि एका मुलाचा आतमध्ये अडकून मृत्यू झाला. कोचिंग सेंटर चालकांनी आधी स्वतः परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती चिघळली तेव्हाच पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आले.

टॅग्स :delhiदिल्ली