शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:08 IST

Ravneet Singh Bittu Criticize Rahul Gandhi: भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस पक्ष खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विधानाचा निषेध करत नाहीत, तोपर्यंत राहुल गांधी यांना एकदा नाही तर १०० वेळा दहशतवादी म्हणेन, असा इशारा बिट्टू यांनी दिला.

भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस पक्ष खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विधानाचा निषेध करत नाहीत, तोपर्यंत राहुल गांधी यांना एकदा नाही तर १०० वेळा दहशतवादी म्हणेन, असा इशारा बिट्टू यांनी दिला. 

न्यूज १८ च्या एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर टीका करताना रवनीत सिंग बिट्टू म्हणाले की, राहुल गांधी पन्नू आणि पाकिस्तान हा  संपूर्ण त्रिकोण तुमच्या समोर आला आहे. नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस हेच सांगत आहेत की, कलम ३७० पुन्हा लागू केलं जाईल. तर दुसरीकडे शिखांना खिळखिळे करण्यासाठी पगडी आणि कड्याबाबत बोलत आहेत. त्याच गोष्टी पन्नू बोलत आहे आणि तेच पाकिस्तान बोलत आहे.  

यावेळी राहुल गांधी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याबद्दल दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत विचारलं असता रवनीत सिंग बिट्टू म्हणाले की, मी राहुल गांधी यांच्याबाबत अजिबात मवाळ भूमिका घेतलेली नाही. माझं जे विधान होतं, ते इतर अनेक लोकांसोबत जोडलं गेलं. राहुल गांधींबाबत आज नड्डा यांनी खूप भक्कमपणे अगदी योग्य पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षांना उत्तर दिलं आहे, असेही रवनीत सिंग बिट्टू म्हणाले.  

रवनीत सिंग बिट्टू पुढे म्हणाले की, आम्ही हुतात्म्याच्या कुटुंबातील आहोत. त्यांनी बलिदान दिलेलं आहे. आम्हाला बलिदान द्यावं लागलं, कारण गांधी कुटुंबीयांनी येथे आग लावली होती. तीच आग जम्मू-काश्मीरमध्ये लावली. यांचा बचाव करण्यासाठी पन्नू आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री उभे राहिले. जे वक्तव्य पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलं आहे, तसेच जे काही पन्नू बोलला आहे, त्याला पाठिंबा देतात की विरोध करतात, हे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट करावं, असे आव्हानही बिट्टू यांनी दिलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा