शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चार ऐवजी आठ जणांना तुरुंगात पाठवणार, अटकेच्या बदल्यात अटक; ममता यांचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 20:34 IST

कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला इशारा दिला.

गेल्या काही दिवसापासून टीएमसीचे नेते अडचणीत सापडले आहेत. काही नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहेत. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आज तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला.' जर केंद्रीय एजन्सींनी त्यांच्या पक्षाच्या चार नेत्यांना अटक केली, तर राज्य पोलीस भाजपच्या आठ नेत्यांना अटक करतील आणि तुम्हाला तुरुंगात पाठवतील, अशा इशारा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी भाजपला दिला आहे. कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "त्यांनी आमच्या चार आमदारांना तुरुंगात पाठवले, या विचाराने आमची संख्या कमी होईल. जर त्यांनी माझ्या चार लोकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले, तर मी त्यांच्या आठ नेत्यांना काही प्रकरणांमध्ये तुरुंगात पाठवीन, असा इशारा त्यांनी दिला.

अभिनेता प्रकाश राज यांच्या अडचणी वाढल्या! ईडीचे समन्स पाठवले, पोंझी स्कीमप्रकरणी होणार चौकशी

कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले. या बैठकीला शेकडो टीएमसी खासदार, आमदार आणि ब्लॉक आणि गाव पातळीवरील नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, केंद्राने सर्वांना बंदुकीच्या टोकावर ठेवले आहे. “आज तुम्ही हसत आहात कारण आमच्या पक्षाचे नेते अनुब्रता मंडल, पार्थ चॅटर्जी, माणिक भट्टाचार्य, ज्योती प्रिया मल्लिक आणि इतर काही नेते तुरुंगात आहेत. ही परंपरा कायम राहणार, तुम्ही खुर्चीवर नसताना भविष्यात कुठे असणार? एका कपाटात?", असा टोलाही बॅनर्जी यांनी लगावला. ईडीने विविध कथित घोटाळ्यांमध्ये अटक केल्यानंतर किमान पाच उच्च-प्रोफाइल TMC नेते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये चार आमदारांचाही समावेश असून त्यापैकी दोन राज्यमंत्री राहिले आहेत.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "तुम्हाला वाटते की तुम्ही काहीही कराल कारण तुम्ही केंद्रात सत्तेत आहात. तुम्ही टीएमसी, अरविंद केजरीवाल, अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि इतर नेत्यांवर ईडी आणि सीबीआय खटले दाखल करत आहात. येत्या काळात हेच अधिकारी तुमच्या मागे लागतील आणि तुम्हाला कोणी सुरक्षा देणार नाही.

"तुम्ही परदेशात जाऊन अनेक विमाने खरेदी केली. एक दिवस प्रश्न उपस्थित होतील. एक दिवस तुम्ही बोफोर्सबाबत राजीव गांधींवर प्रश्न उपस्थित केलेत. मी ती निवडणूक लढवली होती. बोफोर्सची खिल्ली उडवली गेली, चोराप्रमाणे घोषणाबाजी करण्यात आली. आता तुमचा सौदा काय होता? पैसे कुठे गेले?", असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला. 

भाजपने केला पटलवार

सीएम ममता बॅनर्जी यांच्या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "टीएमसी सुप्रिमो विरोधकांना धमकावू लागले आहेत. भाजप नेते राहुल सिन्हा म्हणाले, "त्यांना माहित आहे की त्या आपली जागा गमावत आहे. आगामी काळात त्यांच्या पक्षाचे आणखी नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातील. या अटकेशी भाजप किंवा केंद्राचा काहीही संबंध नाही. हे सर्व कोर्टाने आदेश दिलेले तपास आहेत. त्यांच्या पोलिसांनीही भाजप नेत्यांवर खटले तपासण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा