शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चार ऐवजी आठ जणांना तुरुंगात पाठवणार, अटकेच्या बदल्यात अटक; ममता यांचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 20:34 IST

कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला इशारा दिला.

गेल्या काही दिवसापासून टीएमसीचे नेते अडचणीत सापडले आहेत. काही नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहेत. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आज तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला.' जर केंद्रीय एजन्सींनी त्यांच्या पक्षाच्या चार नेत्यांना अटक केली, तर राज्य पोलीस भाजपच्या आठ नेत्यांना अटक करतील आणि तुम्हाला तुरुंगात पाठवतील, अशा इशारा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी भाजपला दिला आहे. कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "त्यांनी आमच्या चार आमदारांना तुरुंगात पाठवले, या विचाराने आमची संख्या कमी होईल. जर त्यांनी माझ्या चार लोकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले, तर मी त्यांच्या आठ नेत्यांना काही प्रकरणांमध्ये तुरुंगात पाठवीन, असा इशारा त्यांनी दिला.

अभिनेता प्रकाश राज यांच्या अडचणी वाढल्या! ईडीचे समन्स पाठवले, पोंझी स्कीमप्रकरणी होणार चौकशी

कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले. या बैठकीला शेकडो टीएमसी खासदार, आमदार आणि ब्लॉक आणि गाव पातळीवरील नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, केंद्राने सर्वांना बंदुकीच्या टोकावर ठेवले आहे. “आज तुम्ही हसत आहात कारण आमच्या पक्षाचे नेते अनुब्रता मंडल, पार्थ चॅटर्जी, माणिक भट्टाचार्य, ज्योती प्रिया मल्लिक आणि इतर काही नेते तुरुंगात आहेत. ही परंपरा कायम राहणार, तुम्ही खुर्चीवर नसताना भविष्यात कुठे असणार? एका कपाटात?", असा टोलाही बॅनर्जी यांनी लगावला. ईडीने विविध कथित घोटाळ्यांमध्ये अटक केल्यानंतर किमान पाच उच्च-प्रोफाइल TMC नेते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये चार आमदारांचाही समावेश असून त्यापैकी दोन राज्यमंत्री राहिले आहेत.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "तुम्हाला वाटते की तुम्ही काहीही कराल कारण तुम्ही केंद्रात सत्तेत आहात. तुम्ही टीएमसी, अरविंद केजरीवाल, अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि इतर नेत्यांवर ईडी आणि सीबीआय खटले दाखल करत आहात. येत्या काळात हेच अधिकारी तुमच्या मागे लागतील आणि तुम्हाला कोणी सुरक्षा देणार नाही.

"तुम्ही परदेशात जाऊन अनेक विमाने खरेदी केली. एक दिवस प्रश्न उपस्थित होतील. एक दिवस तुम्ही बोफोर्सबाबत राजीव गांधींवर प्रश्न उपस्थित केलेत. मी ती निवडणूक लढवली होती. बोफोर्सची खिल्ली उडवली गेली, चोराप्रमाणे घोषणाबाजी करण्यात आली. आता तुमचा सौदा काय होता? पैसे कुठे गेले?", असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला. 

भाजपने केला पटलवार

सीएम ममता बॅनर्जी यांच्या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "टीएमसी सुप्रिमो विरोधकांना धमकावू लागले आहेत. भाजप नेते राहुल सिन्हा म्हणाले, "त्यांना माहित आहे की त्या आपली जागा गमावत आहे. आगामी काळात त्यांच्या पक्षाचे आणखी नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातील. या अटकेशी भाजप किंवा केंद्राचा काहीही संबंध नाही. हे सर्व कोर्टाने आदेश दिलेले तपास आहेत. त्यांच्या पोलिसांनीही भाजप नेत्यांवर खटले तपासण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा