शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

"…तर मी राजीनामा देईन", मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा CAA-NRC बाबत असे का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:54 IST

Himanta Biswa Sarma : मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा हे शिवसागर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 11 मार्चला संपूर्ण देशात सीएए (CAA) लागू केले आहे. यानंतर आसाममध्ये विरोधकांनी आंदोलन आणि संपाची घोषणा केली आहे. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी भाष्य केले. ज्या व्यक्तीला नागरिकत्व मिळाले आहे आणि त्यांनी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये (National Register of Citizens) अर्ज केला नाही, तर आपण राजीनामा देणारा पहिला व्यक्ती असणार आहे, असे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा हे शिवसागर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी, मी आसामचा मुलगा आहे आणि एनआरसीसाठी अर्ज न केलेल्या एका व्यक्तीलाही नागरिकत्व मिळाले तर मी राजीनामा देणारा पहिला व्यक्ती असेन, असे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले. तसेच, राज्यात सुरू असलेल्या आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला की, सीएए लागू झाल्यानंतर लाखो लोक राज्यात दाखल होतील असा आंदोलकांचा दावा आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, असे झाल्यास विरोध करणारा पहिला मी असेल. सीएएमध्ये नवीन काहीही नाही, जसे की ते पूर्वी लागू केले गेले होते. 

याचबरोबर, मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आता पोर्टलवर अर्ज करण्याची वेळ आली आहे. पोर्टलवरील डेटा आता बोलेल आणि या कायद्याला विरोध करणाऱ्यांचे दावे खरे आहेत की नाही हे स्पष्ट होईल. दरम्यान, केंद्र सरकारने सोमवारी संपूर्ण देशात सीएए लागू केले आहे. त्यानंतर आसाममध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 16-पक्षीय संयुक्त विरोधी मंच, आसाम (यूओएफए) ने मंगळवारी आसाममध्ये संपाची घोषणा केली आहे. तसेच, ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने (AASU) सीएएच्या विरोधात गुवाहाटी, बारपेटा, लखीमपूर, नलबारी, दिब्रुगड आणि तेजपूरसह आसामच्या विविध भागांमध्ये निरर्शने केली.

सीएए अंतर्गत मिळेल नागरिकत्व सीएए कायद्याच्या अंमलबजावणी अंतर्गत, केंद्र सरकार आता बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात करणार आहे. मात्र, यामध्ये 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या सर्व लोकांनाच नागरिकत्व दिले जाईल. यामध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्माचा समावेश आहे.

टॅग्स :Assamआसामcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक