शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"…तर मी राजीनामा देईन", मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा CAA-NRC बाबत असे का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:54 IST

Himanta Biswa Sarma : मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा हे शिवसागर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 11 मार्चला संपूर्ण देशात सीएए (CAA) लागू केले आहे. यानंतर आसाममध्ये विरोधकांनी आंदोलन आणि संपाची घोषणा केली आहे. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी भाष्य केले. ज्या व्यक्तीला नागरिकत्व मिळाले आहे आणि त्यांनी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये (National Register of Citizens) अर्ज केला नाही, तर आपण राजीनामा देणारा पहिला व्यक्ती असणार आहे, असे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा हे शिवसागर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी, मी आसामचा मुलगा आहे आणि एनआरसीसाठी अर्ज न केलेल्या एका व्यक्तीलाही नागरिकत्व मिळाले तर मी राजीनामा देणारा पहिला व्यक्ती असेन, असे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले. तसेच, राज्यात सुरू असलेल्या आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला की, सीएए लागू झाल्यानंतर लाखो लोक राज्यात दाखल होतील असा आंदोलकांचा दावा आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, असे झाल्यास विरोध करणारा पहिला मी असेल. सीएएमध्ये नवीन काहीही नाही, जसे की ते पूर्वी लागू केले गेले होते. 

याचबरोबर, मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आता पोर्टलवर अर्ज करण्याची वेळ आली आहे. पोर्टलवरील डेटा आता बोलेल आणि या कायद्याला विरोध करणाऱ्यांचे दावे खरे आहेत की नाही हे स्पष्ट होईल. दरम्यान, केंद्र सरकारने सोमवारी संपूर्ण देशात सीएए लागू केले आहे. त्यानंतर आसाममध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 16-पक्षीय संयुक्त विरोधी मंच, आसाम (यूओएफए) ने मंगळवारी आसाममध्ये संपाची घोषणा केली आहे. तसेच, ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने (AASU) सीएएच्या विरोधात गुवाहाटी, बारपेटा, लखीमपूर, नलबारी, दिब्रुगड आणि तेजपूरसह आसामच्या विविध भागांमध्ये निरर्शने केली.

सीएए अंतर्गत मिळेल नागरिकत्व सीएए कायद्याच्या अंमलबजावणी अंतर्गत, केंद्र सरकार आता बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात करणार आहे. मात्र, यामध्ये 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या सर्व लोकांनाच नागरिकत्व दिले जाईल. यामध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्माचा समावेश आहे.

टॅग्स :Assamआसामcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक