शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'मी सरकारपुढे हात जोडणार नाही, कोर्टात जाणार अन्...'; खासदार वरुण गांधींचा पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 17:57 IST

वरुण गांधींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जर शेतकर्‍यांच्या मुद्द्यात भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर हात जोडणार नाही, थेट न्यायालयात जाणार.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून भाजप खासदार वरुण गांधी शेतकरी कायद्यावरुन आपल्या सरकारवर टीका करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत आपल्या मतदारसंघातील पीक खरेदीत कोणत्याही प्रकारची अनियमितता ठेवणार नसल्याचे म्हटले आहे. 

नवीन कृषी कायदे आणि यूपी सरकारवर सातत्याने केलेल्या टीकेमुळे वरुन गांधी यांना पक्षाच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. आता वरुण यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जर शेतकर्‍यांच्या मुद्द्यांमध्ये भ्रष्टाचार झाला तर सरकारसोबत हातमिळवणी करणार नाही, थेट कोर्टात जाणार. हा व्हिडिओ शेअर करताना वरुण गांधी यांनी लिहिले की, “जोपर्यंत एमएसपीची वैधानिक हमी मिळत नाही तोपर्यंत अशा मंडईंमध्ये शेतकऱ्यांचे शोषण होतच राहील. यावर कठोर कारवाई व्हायला हवी."

कर्मचाऱ्यांना इशारा

याच व्हिडिओमध्ये वरुण गांधी एका मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. मध्यस्थांचा उल्लेख करून ते म्हणाले, ''आम्ही प्रत्येक गोष्टीत निमित्त शोधता. ओलावा, तुटणे, काळेपणा असे सबब सांगून तुम्ही पिके नाकारता. तुम्ही हेच पीक  तुमच्या मित्रांना आणि इतर मध्यस्थांना 11-1200 ला विकता आणि इतरांना 1940 मध्ये विकता. आतापासून माझा एक प्रतिनिधी राहील आणि प्रत्येक प्रमुख खरेदी केंद्रावर लक्ष ठेवेल. तुम्ही लोकांनी भ्रष्टाचार केला किंवा शेतकर्‍यांवर अन्याय केला तर मी सरकारसमोर हातपाय जोडणार नाही, मी थेट कोर्टात जाऊन तुम्हा सर्वांना अटक करेन,''असा इशाराच वरुण गांधींनी दिला.

याआधीही वरुण गांधी यांनी लखीमपूर जिल्ह्यातील बाजारपेठेत शेतकऱ्यांचे पीक जाळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला होता. शनिवारी वरुण गांधी यांनी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, "उत्तर प्रदेशातील समोध सिंह, शेतकरी गेल्या 15 दिवसांपासून आपले पीक विकण्यासाठी मंडईत चकरा मारत होते, हे विकले गेले नाही तेव्हा निराश होऊन आपल्याच पीकाला आग लावली. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना कुठे आणले आहे? कृषी धोरणाचा पुनर्विचार करणे ही काळाची गरज आहे. यापूर्वी अनेकदा वरुण गांधी यांनी कृषी कायद्यांबाबत भाष्य केलं आहे.

 

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश