शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

Vidhan Sabha 2019 : होले होले हो जायेंगा प्यार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:15 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पक्षांतर, नवीन कार्यकर्ते, नवीन पक्ष, नवीन उमेदवार यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीला ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्षांतर, नवीन कार्यकर्ते, नवीन पक्ष, नवीन उमेदवार यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीला असलेले गोंधळाचे वातावरण हळूहळू निवळू लागले आहे. उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते यांचीही नाळ ‘होले होले हो जायेंगा प्यार..’ प्रमाणे हळूहळू जुळू लागली असल्याने निवडणुकीचे चित्र देखील अंतिम टप्प्यात स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सुरुवातीला अधिकच गोंधळाचे वातावरण होते. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नंदुरबार मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येलाच राजकारणातील मोठी उलथापालथ झाली. याठिकाणी डॉ.विजयकुमार गावीत यांचे पारंपरिक विरोधक चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे डॉ.गावीत यांची निवडणूक त्यांनी सोपी केल्याचे चित्र असतानाच शहाद्याचे आमदार उदेसिंग पाडवी यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंदुरबारमध्ये डॉ.गावीतांना आव्हान दिले. या मतदारसंघात रघुवंशींचे अचानक काँग्रेस सोडणे आणि पाडवींचे भाजप सोडून काँग्रेसमध्ये येणे सुरुवातीला कार्यकर्ते आणि लोकांनाही रुजत नव्हते. पण गेल्या आठ-दहा दिवसाच्या प्रचारात हळूहळू त्यांना समर्थकांची मने वळविण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे. शहादा विधानसभा मतदारसंघातदेखील भाजपचे उमेदवार राजेश पाडवी हे नवीन आहेत. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढवीत आहे. त्यांच्याविरोधात माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी आहे. राजेश पाडवी नवीन असल्याने आणि उदेसिंग पाडवींनी भाजप सोडल्याने याठिकाणी राजेश पाडवी यांना जुने कार्यकर्ते व नवीन कार्यकर्ते यांच्याशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीला कसरत करावी लागली. त्यातच याठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले रुपसिंग पाडवी व राजेंद्रकुमार गावीत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच मतदारसंघात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व नगराध्यक्ष मोतीलाल पाटील आणि त्यांचे सुपुत्र जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील हेदेखील भाजपत असले तरी त्यांचे एकमेकांमधील मतभेद उघड आहेत. त्यांनाही पक्ष पातळीवर एकत्र आणून काम करणे भाजपच्या नवीन उमेदवारासाठी सुरुवातीला काहीसे अवघड होते. पण त्यांचेही सूर आता जुळू लागले आहेत. याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार व निवृत्त कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा  हे देखील ‘एकला चलो रे’ प्रमाणे प्रचारात जोर धरत असल्याने येथील निवडणुकीतही रंगत आली आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघातील चित्र अधिकच रंगतदार बनले आहे. याठिकाणी गेल्या चार-साडेचार दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी असलेले सुरुपसिंग नाईक  व माणिकराव गावीत या दोन्ही नेत्यांच्या वारसदारांमध्ये लढत आहे. आजवर हे दोन्ही नेते अनेक वर्षे एकत्र एकाच पक्षात असल्याने दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकच होते. पण या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांच्यात विरोध झाल्याने कार्यकत्र्यानाही कुणाची बाजू घ्यावी असा प्रश्न पडला होता. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारात याठिकाणी देखील हळूहळू दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते प्रचारात समोर येत असल्याने येथील निवडणुकीचे चित्रही स्पष्ट होत आहे. याच मतदारसंघात माजी आमदार शरद गावीत हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. नवापूर मतदारसंघाचा निम्मा भाग नंदुरबार तालुक्यात आहे. शरद गावीत हे डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू तर खासदार डॉ.हीना गावीत यांचे काका आहेत. तर येथीलच प्रभावी नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला असला तरी सुरुपसिंग नाईक व माणिकराव गावीत यांना ते आजवर नेते मानत आले आहेत. त्यामुळे गावीत परिवार व रघुवंशी महायुतीच्याच उमेदवारासाठी शक्तीपणाला लावतील की आतून आपापले हित जोपासतील याबाबत अजूनही लोकांमध्ये साशंकता कायम आहे.अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसतर्फे सलग सातवेळा विजयी झालेले आमदार अॅड.के.सी. पाडवी या वेळी पुन्हा आठव्यांदा काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमशा पाडवी निवडणूक लढवीत आहेत. याठिकाणी भाजपचे बंडखोर उमेदवार नागेश पाडवी हेदेखील रिंगणात आहेत. चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत गेल्याने येथील शिवसेनेची धुरा त्यांनी सांभाळली आहे. याठिकाणी देखील के.सी. पाडवी यांचे कार्यकर्ते व चंद्रकांत रघुवंशी यांचे कार्यकर्ते आजवर बहुतांश एकच होते. त्यामुळे येथेदेखील संभ्रमीत अवस्था आहे. त्यातच भाजपच्या बंडखोर उमेदवाराने डोकेदुखी वाढवली आहे.एकूणच निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. नेते आणि उमेदवार आपापल्या समर्थकांची मन वळविण्याचे प्रयत्न करीत असून निवडणुकीच्या सुरुवातीला राजकीय गोंधळाचे असलेले वातावरण हळूहळू निवळत आहे.