शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अनेक ट्युबलाईट यांच्यासारख्या आहेत; नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिला 'करंट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:49 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 31 जानेवारीला संयुक्त सत्रामध्ये अभिभाषण केले होते. यामध्ये 370 आणि 35 ए कलम हटविण्याचा उल्लेख केला होता. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखचा विकासाचा मार्ग खुला झाल्याचे ते म्हणाले होते. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ६ महिन्यांनंतर मोदी घराबाहेर पडू शकणार नाहीत, या वक्तव्याचा समाचार घेतला. शिवाय काँग्रेसचे वादग्रस्त खासदार अधीर रंजन चौधरी यांनाही कोपरखळी हाणली. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 31 जानेवारीला संयुक्त सत्रामध्ये अभिभाषण केले होते. यामध्ये 370 आणि 35 ए कलम हटविण्याचा उल्लेख केला होता. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखचा विकासाचा मार्ग खुला झाल्याचे ते म्हणाले होते. 

यावर मोदी म्हणाले की, सरकार बदलली आहे. विचारही बदलण्याची गरज आहे. जर आम्ही पहिल्यासारख्याच मार्गाने चालत राहिलो तर पुढील 70 वर्षांपर्यंतही कदाचित 370 हटविले नसते. तसेच मुस्लिम महिलांवर तिहेरी तलाकची तलवार टांगती असली असती. राम जन्मभूमी आजही वादांमध्येच असली असती. करतारपूर साहेब कॉरिडॉरही कधीच बनला नसता आणि ना ही बांगलादेश सीमा वाद सुटला असता, असे मोदी यांनी सांगितले. 

यानंतर मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. कॅबिनेटमध्ये मंजूर झालेला प्रस्ताव पत्रकार परिषदेमध्ये फाडून टाकणाऱ्यांनाच संविधान वाचविण्याचे शिक्षण घेतले पाहिजे, असा टोला हाणला. यानंतर त्यांनी ६ महिन्यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

काँग्रेसने गेल्या 70 वर्षांत कधीही आत्मसंतुष्टी अनुभवली नाही असे मला वाटते. काल एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की देशातील तरुण मोदीला दांड्याने मारतील. मी पुढील सहा महिने अशा प्रकारे सूर्यनमस्काराची संख्या वाढवेन की पाठ मजबूत झाली पाहिजे. यामुळे कोणीही दांडा मारू शकेल. मी घाणेरड्या शिव्या ऐकल्या आहेत. आनंद यात आहे की 30-40 मिनिट बोलल्यानंतर काँग्रेसला आता तरी करंट लागला, असा टोला त्यांनी राहुल यांना हाणला. मोदींच्या भाषणावेळी विरोधासाठी उठलेल्या राहुल गांधी यांना यांच्यासारख्या ट्युबलाईटला आता करंट आला, अशी टिप्पणी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभा