शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

मरण पत्करेन पण आता भाजपासोबत हातमिळवणी नाही; मुख्यमंत्री नितीश कुमार स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 12:56 IST

भाजपसोबत परत जाण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

नवी दिल्ली-

भाजपसोबत परत जाण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. आपण आता भाजपसोबत कधीही जाऊ शकत नाही. एकवेळ मरण पत्करणं मान्य आहे, पण भाजपसोबत जाऊ शकत नाही, असं नितीश कुमार म्हणाले. त्यामुळे जे लोक भाजपासोबत पुन्हा जाणाच्या हवेतील चर्चा करत आहेत, त्यांनी आता अशा चर्चा करणं थांबवावं. कारण आता भाजपसोबत जातील असा प्रश्नच उद्भवत नाही, असंही नितीश कुमार म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा न जाण्याचा निर्धार केला आहे.

भाजपच्या या प्रस्तावाला उत्तर देताना नितीश कुमार यांनी हे विधान केलं आहे. यासोबतच नितीश कुमार यांनी भाजपवर लालू प्रसाद यादव यांना अडकवल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे, बिहार भाजप युनिटचे अध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले की, संपूर्ण राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

नितीश यांच्याकडून धोका आता पुन्हा नाही- जयस्वालबिहारचे मुख्यमंत्री कुमार यांचा पक्ष जनता दल-युनायटेड (JDU) ने भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. संजय जयस्वाल म्हणाले, “आम्ही नितीश कुमार यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याच्या पक्ष कार्यकर्त्यांमधील अफवा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांची वृत्ती कधी इकडे तर कधी तिकडे अशी राहिली आहे, पण आम्ही पुन्हा त्यांच्याकडून फसणार नाही"

नितीश यांनी पंतप्रधानांचा विश्वास तोडला - जयस्वालसंजय जयस्वाल म्हणाले, नितीश कुमार हे काही लोकप्रिय नाहीत. जेडीयूने २०२० च्या विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली, तर आमची कामगिरी चांगली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णय घेऊन औदार्य दाखवले आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण, नितीश कुमार सवयीनं अविश्वासू आहेत. नितीश कुमार यांनी पंतप्रधानांनी टाकलेल्या विश्वासाचा गैरवापर केला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार