शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मरण पत्करेन पण आता भाजपासोबत हातमिळवणी नाही; मुख्यमंत्री नितीश कुमार स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 12:56 IST

भाजपसोबत परत जाण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

नवी दिल्ली-

भाजपसोबत परत जाण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. आपण आता भाजपसोबत कधीही जाऊ शकत नाही. एकवेळ मरण पत्करणं मान्य आहे, पण भाजपसोबत जाऊ शकत नाही, असं नितीश कुमार म्हणाले. त्यामुळे जे लोक भाजपासोबत पुन्हा जाणाच्या हवेतील चर्चा करत आहेत, त्यांनी आता अशा चर्चा करणं थांबवावं. कारण आता भाजपसोबत जातील असा प्रश्नच उद्भवत नाही, असंही नितीश कुमार म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा न जाण्याचा निर्धार केला आहे.

भाजपच्या या प्रस्तावाला उत्तर देताना नितीश कुमार यांनी हे विधान केलं आहे. यासोबतच नितीश कुमार यांनी भाजपवर लालू प्रसाद यादव यांना अडकवल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे, बिहार भाजप युनिटचे अध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले की, संपूर्ण राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

नितीश यांच्याकडून धोका आता पुन्हा नाही- जयस्वालबिहारचे मुख्यमंत्री कुमार यांचा पक्ष जनता दल-युनायटेड (JDU) ने भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. संजय जयस्वाल म्हणाले, “आम्ही नितीश कुमार यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याच्या पक्ष कार्यकर्त्यांमधील अफवा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांची वृत्ती कधी इकडे तर कधी तिकडे अशी राहिली आहे, पण आम्ही पुन्हा त्यांच्याकडून फसणार नाही"

नितीश यांनी पंतप्रधानांचा विश्वास तोडला - जयस्वालसंजय जयस्वाल म्हणाले, नितीश कुमार हे काही लोकप्रिय नाहीत. जेडीयूने २०२० च्या विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली, तर आमची कामगिरी चांगली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णय घेऊन औदार्य दाखवले आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण, नितीश कुमार सवयीनं अविश्वासू आहेत. नितीश कुमार यांनी पंतप्रधानांनी टाकलेल्या विश्वासाचा गैरवापर केला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार