शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Ashok Gehlot : "लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ; मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून हा खेळ चालला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 14:41 IST

Ashok Gehlot And Modi Government : आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत गेहलोत यांनी आभार मानले आहेत

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी गेल्या वर्षी आपल्या सरकारवर आलेल्या संकटावरून पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "लोकशाही हा जादूच्या आकड्यांचा खेळ आहे. मी जादूगार होतो, म्हणून हा खेळ चालला" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. यासोबतच "आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच" असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेहलोत सध्या  बीकानेर, सीकर, चुरू आणि जयपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. 

अशोक गेहलोत यांनी प्रशासनाची शहर/गावांसोबत मोहीम' कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरांना भेट दिली. यावेळी जनतेसमोर काँग्रेस सरकारच्या कामांचा पाढा वाचतानाच आपल्या सरकारला गेल्या वर्षी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. शाहपूराच्या करीरी गावात झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी अशोक गेहलोत आपल्या सरकारला साथ देणाऱ्या अपक्ष आणि बसपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे.

"अमित शाह यांचे सर्वच प्रयत्न येथे अयशस्वी ठरले"

आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत गेहलोत यांनी आभार मानले आहेत. तसेच "अमित शाह यांचे सगळे प्रयत्न इथे अयशस्वी ठरले" असं म्हणत थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. "आमचं सरकार वाचलंय ते या लोकांमुळेच... भाजपाने दिल्लीच्या दरबारात बसून याचा कट रचला हे आम्ही कसं विसरू शकतो. काय काय डावपेच खेळण्यात आले नाहीत... हे सगळे आमदार तब्बल 34 दिवस माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहिले. 100 पैकी 19 निघून गेले... पण हा लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ आहे. मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून खेळ चालला."

"200 आमदारांपैकी 101, 100 असा आकड्यानं खेळ चालत नाही"

"जादुई आकड्याच्या खेळात 200 आमदारांपैकी 101, 100 असा आकड्यानं खेळ चालत नाही"  असं देशील अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली 18 आमदारांनी गहलोत यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे गेहलोत सरकारवर संकट कोसळलं होतं. मात्र पक्ष नेतृत्वानं वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस