शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

Ashok Gehlot : "लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ; मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून हा खेळ चालला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 14:41 IST

Ashok Gehlot And Modi Government : आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत गेहलोत यांनी आभार मानले आहेत

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी गेल्या वर्षी आपल्या सरकारवर आलेल्या संकटावरून पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "लोकशाही हा जादूच्या आकड्यांचा खेळ आहे. मी जादूगार होतो, म्हणून हा खेळ चालला" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. यासोबतच "आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच" असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेहलोत सध्या  बीकानेर, सीकर, चुरू आणि जयपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. 

अशोक गेहलोत यांनी प्रशासनाची शहर/गावांसोबत मोहीम' कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरांना भेट दिली. यावेळी जनतेसमोर काँग्रेस सरकारच्या कामांचा पाढा वाचतानाच आपल्या सरकारला गेल्या वर्षी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. शाहपूराच्या करीरी गावात झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी अशोक गेहलोत आपल्या सरकारला साथ देणाऱ्या अपक्ष आणि बसपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे.

"अमित शाह यांचे सर्वच प्रयत्न येथे अयशस्वी ठरले"

आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत गेहलोत यांनी आभार मानले आहेत. तसेच "अमित शाह यांचे सगळे प्रयत्न इथे अयशस्वी ठरले" असं म्हणत थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. "आमचं सरकार वाचलंय ते या लोकांमुळेच... भाजपाने दिल्लीच्या दरबारात बसून याचा कट रचला हे आम्ही कसं विसरू शकतो. काय काय डावपेच खेळण्यात आले नाहीत... हे सगळे आमदार तब्बल 34 दिवस माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहिले. 100 पैकी 19 निघून गेले... पण हा लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ आहे. मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून खेळ चालला."

"200 आमदारांपैकी 101, 100 असा आकड्यानं खेळ चालत नाही"

"जादुई आकड्याच्या खेळात 200 आमदारांपैकी 101, 100 असा आकड्यानं खेळ चालत नाही"  असं देशील अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली 18 आमदारांनी गहलोत यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे गेहलोत सरकारवर संकट कोसळलं होतं. मात्र पक्ष नेतृत्वानं वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस