शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:30 IST

Satyapal Malik Passes Away:जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

Satyapal Malik Death: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मंगळवारी दुपारी १ वाजता त्यांनी नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ११ मे रोजी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सत्यपाल मलिक यांनी पदावर असतानाही उघडपणे सरकारचा जोरदार विरोध केला आहे. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच सत्यपाल मलिक यांनी एक खळबळजनक  पोस्ट करत मला सत्य सांगायचे असं म्हटलं होतं. रुग्णालयात असताना सत्यपाल मलिक यांनी ७ जून रोजी एक्सवर पोस्ट केली होती. "मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे. काल सकाळपासून मी ठीक होतो पण आज मला पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जिवंत असलो किंवा नसलो तरी माझ्या देशवासियांना मला सत्य सांगायचे आहे," असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं.

"मी राज्यपाल पदावर असताना मला १५०-१५० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, पण मी माझे राजकीय गुरू, शेतकरी मसीहा दिवंगत चौधरी चरण सिंह जी यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मी राज्यपाल असताना शेतकरी आंदोलनही सुरू होते. कोणत्याही राजकीय लोभाशिवाय मी पदावर असताना शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. त्यानंतर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात जंतरमंतर ते इंडिया गेट पर्यंतच्या प्रत्येक लढतीत मी त्यांच्यासोबत होतो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांचा मुद्दा उपस्थित केला आला होता, ज्याची चौकशी या सरकारने आजपर्यंत केलेली नाही. सरकार मला सीबीआयला धमकी देऊन खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी निमित्त शोधत होती. ज्या निविदेच्या प्रकरणामध्ये त्यांना मला अडकवायचे होतो ती मी स्वतः रद्द केली होती. मी स्वतः पंतप्रधानांना सांगितले होते की या प्रकरणात भ्रष्टाचार झालाय. त्यांना सांगितल्यानंतर मी स्वतः निविदा रद्द केली. माझ्या पदावरुन हटवल्यानंतर या निविदेवर दुसऱ्याच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या," असंही सत्यपाल मलिक म्हणाले.

"मला सरकार आणि सरकारी संस्थांना सांगायचे आहे की मी शेतकरी समुदायाचा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही. सरकारने माझी बदनामी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली. मी सरकार आणि त्यांच्या यंत्रणांना विनंती करतो की त्यांनी माझ्या देशातील लोकांना तपासादरम्यान काय आढळले ते जरा सांगावं.  सत्य हे आहे की ५० वर्षांहून अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीत उच्च पदांवर देशाची सेवा करण्याची संधी असूनही, मी अजूनही एका खोलीच्या घरात राहतो आणि कर्जातही बुडालो आहे. जर आज माझ्याकडे पैसे असते तर मी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असते," अशी खदखद सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाDeathमृत्यू