शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मला या देशातील विद्वेषाचे वातावरण संपवायचे आहे..., काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 08:59 IST

Rahul Gandhi: देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे  आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. 

हैदराबाद - देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. 

तेलंगणातील नामपल्ली येथे प्रचारसभेत ते म्हणाले की, मी केंद्र सरकारविरोधात देत असलेल्या लढ्यामुळे माझ्यावर विविध राज्यांमध्ये २४ खटले दाखल करण्यात आले. त्या खटल्यांसंदर्भात मला न्यायालयांकडून नेहमी समन्स येत असतात.बदनामीच्या खटल्यात मला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. माझे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. केंद्र सरकारने माझे शासकीय निवासस्थानही काढून घेतले. पण या गोष्टींनी मी अजिबात डगमगलो नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

ओवैसी यांच्यावर किती खटले आहेत?राहुल गांधी म्हणाले की, माझ्यामागे ईडी, सीबीआयसहित अन्य सरकारी यंत्रणांचा भुंगा लागलेला असतो. मात्र ओवैसी यांची एका तरी सरकारी यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे का, असा सवाल त्यांनी केला. 

सोनिया यांचा व्हिडीओ संदेश - तेलंगणात काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केले. त्यांनी सांगितले की, उत्तम व प्रामाणिक सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे. - त्यासाठी मतदारांनी काँग्रेसला विजयी करावे. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष प्रयत्नशील असणार आहे, असेही सोनिया गांधी आपल्या दोन मिनिटांच्या व्हिडीओ संदेशात म्हटले.

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३