शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

'मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही'; मलिकांचा करारी बाणा, राऊतांची दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 23:27 IST

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पुन्हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने तोंडी समन्स पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलिक यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी एजन्सीने हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सीबीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र, मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही, असा करारी बाणाही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, गंभीर आरोपही केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने सत्यपाल मलिक यांना समन्स बजावले आहे. दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्यांची चौकशी केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सत्यपाल मलिक यांनी ८ दिवसांपूर्वी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. तसेच, पुलवामा हल्ल्यासंदर्भातही गौप्यस्फोट केला होता.

दरम्यान, सीबीआयच्या समन्सनंतर सत्यपाल मलिक यांनी ट्विटरवरुन आपली भूमिका व्यक्त केली आहे. मी सत्य बोलून काही जणांचे पाप उघडे केले आहेत, कदाचित त्यामुळेच मला बोलावणं आलं आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, घाबरणार नाही, सत्यासोबतच राहणार, असे मलिक यांनी म्हटलंय. मलिक यांचे हे ट्विट रिट्विट करत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जय हिंद म्हटलं आहे. तसेच, जो डर गया, वो मर गया... असेही राऊत यांनी म्हटलं आहे. 

'पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार' : सत्यपाल मलिक

काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी यांनी मोठा दावा केला होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरने थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल 40 CRPF जवान शहीद झाले होते. ही घटना सरकारच्या चुकीमुळे झाल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी त्यावेळी मला गप्प राहायला सांगितले, असेही ते म्हणाले. त्यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाCBIगुन्हा अन्वेषण विभागJammu Kashmirजम्मू-काश्मीर