शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

'मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही'; मलिकांचा करारी बाणा, राऊतांची दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 23:27 IST

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पुन्हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने तोंडी समन्स पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलिक यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी एजन्सीने हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सीबीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र, मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही, असा करारी बाणाही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, गंभीर आरोपही केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने सत्यपाल मलिक यांना समन्स बजावले आहे. दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्यांची चौकशी केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सत्यपाल मलिक यांनी ८ दिवसांपूर्वी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. तसेच, पुलवामा हल्ल्यासंदर्भातही गौप्यस्फोट केला होता.

दरम्यान, सीबीआयच्या समन्सनंतर सत्यपाल मलिक यांनी ट्विटरवरुन आपली भूमिका व्यक्त केली आहे. मी सत्य बोलून काही जणांचे पाप उघडे केले आहेत, कदाचित त्यामुळेच मला बोलावणं आलं आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, घाबरणार नाही, सत्यासोबतच राहणार, असे मलिक यांनी म्हटलंय. मलिक यांचे हे ट्विट रिट्विट करत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जय हिंद म्हटलं आहे. तसेच, जो डर गया, वो मर गया... असेही राऊत यांनी म्हटलं आहे. 

'पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार' : सत्यपाल मलिक

काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी यांनी मोठा दावा केला होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरने थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल 40 CRPF जवान शहीद झाले होते. ही घटना सरकारच्या चुकीमुळे झाल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी त्यावेळी मला गप्प राहायला सांगितले, असेही ते म्हणाले. त्यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाCBIगुन्हा अन्वेषण विभागJammu Kashmirजम्मू-काश्मीर