शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:11 IST

जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - Narendra Modi on Congress ( Marathi News ) काँग्रेस सध्या जाती आरक्षणावर बोलत आहे. परंतु काँग्रेसनं स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी यांना काँग्रेसचा जन्मजात विरोध आहे. हा विचार आताचा नाही तर आधीपासून आहे. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते, त्यात आरक्षण मला आवडत नाही. विशेषत: नोकरीत आरक्षण मिळायलाच नको, या पत्राचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. राज्यसभेत पंतप्रधान मोदी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत होते. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात पहिल्यांदा NDA सरकारनं आदिवासी लेकीला राष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं. आमच्यासोबत तुमचे वैचारिक विरोध असतील परंतु एका आदिवासी समाजातील महिलेला इतक्या मोठ्या पदावर बसवलं जात होतं म्हणून काँग्रेसनं विरोध केला. जबाबदार नेत्यांकडून राष्ट्रपतींचा अपमान केला जातोय. जो मनात द्वेष आहे तो बाहेर काढला जातो. समाजातील वंचित घटकांबाबत नेहमीच काँग्रेसच्या मनात राग आहे. गेली ७० वर्ष काँग्रेसनं जम्मू काश्मीरातील SC, ST आणि OBC यांना आरक्षणापासून वंचित ठेवले. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही जितके काम केले आहे ते समाजातील एसटी, एससी आणि ओबीसी घटकांसाठी आहे. त्यांना पक्के घर मिळाले. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगराईपासून मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवले. चुलीतील धुरामुळे होणाऱ्या त्रासापासून महिलांना मुक्त केले. उज्ज्वला योजना आणली. मोफत गॅस, मोफत रेशन यातील लाभार्थी याच घटकातील लोक आहेत. काँग्रेसनं आधीपासून आरक्षणाला विरोध केला. जर एससी, एसटी आणि ओबीसी यांना आरक्षण मिळाले तर सरकारी कामकाजाचा स्तर घसरेल असं नेहरूंनी पत्रात म्हटलं होते असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. 

दरम्यान, सीताराम केसरी हे अतिमागास वर्गीय जातीतून येत होते. ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. परंतु त्यांना उचलून फुटपाथवर फेकून दिले. हा व्हिडिओ देशाने पाहिला. यांचे मार्गदर्शक अमेरिकेत बसले आहेत. मागील निवडणुकीत हुआ तो हुआ यासाठी ते फेमस झाले होते. काँग्रेस या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. काँग्रेसनं संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कमी करण्याचा खूप प्रयत्न केले. आंबेडकरांना काँग्रेसनं भारतरत्नही दिला नाही. ज्या काँग्रेसला त्यांच्या नेत्यांवर गॅरंटी नाही, पक्षाच्या धोरणांवर गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायेत अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसreservationआरक्षणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर