शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:11 IST

जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - Narendra Modi on Congress ( Marathi News ) काँग्रेस सध्या जाती आरक्षणावर बोलत आहे. परंतु काँग्रेसनं स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी यांना काँग्रेसचा जन्मजात विरोध आहे. हा विचार आताचा नाही तर आधीपासून आहे. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते, त्यात आरक्षण मला आवडत नाही. विशेषत: नोकरीत आरक्षण मिळायलाच नको, या पत्राचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. राज्यसभेत पंतप्रधान मोदी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत होते. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात पहिल्यांदा NDA सरकारनं आदिवासी लेकीला राष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं. आमच्यासोबत तुमचे वैचारिक विरोध असतील परंतु एका आदिवासी समाजातील महिलेला इतक्या मोठ्या पदावर बसवलं जात होतं म्हणून काँग्रेसनं विरोध केला. जबाबदार नेत्यांकडून राष्ट्रपतींचा अपमान केला जातोय. जो मनात द्वेष आहे तो बाहेर काढला जातो. समाजातील वंचित घटकांबाबत नेहमीच काँग्रेसच्या मनात राग आहे. गेली ७० वर्ष काँग्रेसनं जम्मू काश्मीरातील SC, ST आणि OBC यांना आरक्षणापासून वंचित ठेवले. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही जितके काम केले आहे ते समाजातील एसटी, एससी आणि ओबीसी घटकांसाठी आहे. त्यांना पक्के घर मिळाले. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगराईपासून मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवले. चुलीतील धुरामुळे होणाऱ्या त्रासापासून महिलांना मुक्त केले. उज्ज्वला योजना आणली. मोफत गॅस, मोफत रेशन यातील लाभार्थी याच घटकातील लोक आहेत. काँग्रेसनं आधीपासून आरक्षणाला विरोध केला. जर एससी, एसटी आणि ओबीसी यांना आरक्षण मिळाले तर सरकारी कामकाजाचा स्तर घसरेल असं नेहरूंनी पत्रात म्हटलं होते असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. 

दरम्यान, सीताराम केसरी हे अतिमागास वर्गीय जातीतून येत होते. ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. परंतु त्यांना उचलून फुटपाथवर फेकून दिले. हा व्हिडिओ देशाने पाहिला. यांचे मार्गदर्शक अमेरिकेत बसले आहेत. मागील निवडणुकीत हुआ तो हुआ यासाठी ते फेमस झाले होते. काँग्रेस या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. काँग्रेसनं संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कमी करण्याचा खूप प्रयत्न केले. आंबेडकरांना काँग्रेसनं भारतरत्नही दिला नाही. ज्या काँग्रेसला त्यांच्या नेत्यांवर गॅरंटी नाही, पक्षाच्या धोरणांवर गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायेत अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसreservationआरक्षणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर