शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:11 IST

जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - Narendra Modi on Congress ( Marathi News ) काँग्रेस सध्या जाती आरक्षणावर बोलत आहे. परंतु काँग्रेसनं स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी यांना काँग्रेसचा जन्मजात विरोध आहे. हा विचार आताचा नाही तर आधीपासून आहे. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते, त्यात आरक्षण मला आवडत नाही. विशेषत: नोकरीत आरक्षण मिळायलाच नको, या पत्राचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. राज्यसभेत पंतप्रधान मोदी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत होते. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात पहिल्यांदा NDA सरकारनं आदिवासी लेकीला राष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं. आमच्यासोबत तुमचे वैचारिक विरोध असतील परंतु एका आदिवासी समाजातील महिलेला इतक्या मोठ्या पदावर बसवलं जात होतं म्हणून काँग्रेसनं विरोध केला. जबाबदार नेत्यांकडून राष्ट्रपतींचा अपमान केला जातोय. जो मनात द्वेष आहे तो बाहेर काढला जातो. समाजातील वंचित घटकांबाबत नेहमीच काँग्रेसच्या मनात राग आहे. गेली ७० वर्ष काँग्रेसनं जम्मू काश्मीरातील SC, ST आणि OBC यांना आरक्षणापासून वंचित ठेवले. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही जितके काम केले आहे ते समाजातील एसटी, एससी आणि ओबीसी घटकांसाठी आहे. त्यांना पक्के घर मिळाले. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगराईपासून मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवले. चुलीतील धुरामुळे होणाऱ्या त्रासापासून महिलांना मुक्त केले. उज्ज्वला योजना आणली. मोफत गॅस, मोफत रेशन यातील लाभार्थी याच घटकातील लोक आहेत. काँग्रेसनं आधीपासून आरक्षणाला विरोध केला. जर एससी, एसटी आणि ओबीसी यांना आरक्षण मिळाले तर सरकारी कामकाजाचा स्तर घसरेल असं नेहरूंनी पत्रात म्हटलं होते असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. 

दरम्यान, सीताराम केसरी हे अतिमागास वर्गीय जातीतून येत होते. ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. परंतु त्यांना उचलून फुटपाथवर फेकून दिले. हा व्हिडिओ देशाने पाहिला. यांचे मार्गदर्शक अमेरिकेत बसले आहेत. मागील निवडणुकीत हुआ तो हुआ यासाठी ते फेमस झाले होते. काँग्रेस या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. काँग्रेसनं संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कमी करण्याचा खूप प्रयत्न केले. आंबेडकरांना काँग्रेसनं भारतरत्नही दिला नाही. ज्या काँग्रेसला त्यांच्या नेत्यांवर गॅरंटी नाही, पक्षाच्या धोरणांवर गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायेत अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसreservationआरक्षणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर