शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 14:35 IST

कोरोनाच्या संकटात बाजारात तरलता वाढवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण पुन्हा अर्थव्यवस्थेला गती देऊ शकत नाही.

नवी दिल्लीः सध्याच्या परिस्थितीत मुंबईत येण्याचे धाडस नाही, पण ही परिस्थिती नक्कीच बदलेल, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. कोरोनाच्या संकटात देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंद्यांवर त्याचा परिमाण होत आहे. त्यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. बँकांशी संबंधित प्रश्न, मागणी आणि पुरवठ्यासह तरलतेच्या समस्या आहेत हे मी स्वीकार करतो. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सर्वात महत्त्वाची समस्या तरलता आहे. कोरोनाच्या संकटात बाजारात तरलता वाढवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण पुन्हा अर्थव्यवस्थेला गती देऊ शकत नाही.बाजारात तरलता वाढवणे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीतून एमएसएमई, पायाभूत सुविधा, रस्ते क्षेत्र, जहाज वाहतूक, बंदर इत्यादी क्षेत्रात परकीय गुंतवणूक आणण्यास आमचं प्राधान्य राहील. मार्चअखेरपर्यंत ग्रामीण भागातील उलाढाल 88,000 कोटी रुपये आहे. ती उलाढाल दोन वर्षांत ५ लाख कोटी रुपये करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आमची प्राथमिकता कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगाराची क्षमता निर्माण करण्यावर राहणार असल्याचंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.तत्पूर्वी कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणा करण्यास केंद्र सरकारची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता.‘इंडियन बिझिनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल’च्या पदाधिकाऱ्यांशी गडकरी यांनी रविवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी ते बोलले होते. कोरोनाचे संकट हे तात्पुरते संकट आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून निराशेतून बाहेर पडले पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले. देशात आज सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांचे महत्त्व वाढले आहे. उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे. याचा उपयोग करून निर्यातवाढीवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या