शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

अयोध्या प्रकरणात मी धमकी दिली नाही, फक्त भीती व्यक्त केली- श्री श्री रविशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 15:09 IST

रतात शांतता राहू द्या. आपल्या देशाचा सीरिया होता कामा नये. असं झालं तर मोठा अनर्थ होईल.

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर आणि मशिदीचा तिढा सुटला नाही, तर भारतात सीरियासारखी परिस्थिती उद्भवेल, या विधानाविषयी श्री श्री रविशंकर यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. माझ्या विधानात कोणतीही धमकीची भाषा नव्हती. मी केवळ चिंता व्यक्त केली होती, असे त्यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, भारतात शांतता राहू द्या. आपल्या देशाचा सीरिया होता कामा नये. असं झालं तर मोठा अनर्थ होईल. अयोध्या हे मुस्लिमांचे धार्मिक स्थळ नाही. त्यामुळे मुस्लिमांनी येथील आपला दावा सोडून एक आदर्श निर्माण केला पाहिजे, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले होते. त्यावर अनेकांनी टीका केली होती. श्री श्री रविशंकर हे राज्यघटनेला मानत नाहीत. त्यांचा कायद्यावर विश्वास नाही. रविशंकर हे स्वत:लाच कायद्यासमान मानतात. ते स्वत:ला एवढे मोठे समजतात की, इतरांनी नेहमी त्यांचे ऐकावे असे त्यांना वाटते. ते पक्षपाती आहेत, अशी टीका एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी केली होती. यावर स्पष्टीकरण देताना श्री श्री रविशंकर यांनी म्हटले की, मी स्वप्नातही एखाद्याला धमकी देण्याचा विचार करु शकत नाही. मी एवढेच म्हटले होते की, आपल्या देशात मध्यपूर्वेतील देशांप्रमाणे हिंसा होऊ नये. मला त्याची भीती वाटते, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याBJPभाजपा