शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मी विरोधकांच्या महाआघाडीत येतो; मात्र मला उपपंतप्रधानपद मिळावे - चंद्रशेखर राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 05:51 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे दोन प्रस्ताव ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली/चेन्नई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे दोन प्रस्ताव ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊ न केंद्रात सरकार स्थापन करावे आणि त्यास काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असा एक प्रस्ताव आहे. काँग्रेसला अधिक जागा मिळाल्यास प्रादेशिक पक्षांच्या आघाडीने त्यास पाठिंबा द्यावा आणि त्यात आपणास उपपंतप्रधानपद देण्यात यावे, असा दुसरा प्रस्ताव आहे.

स्टॅलिन यांनी पहिला प्रस्ताव अमान्य केला असून, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी आपला पाठिंबा राहील, असे त्यांनी केसीआर यांना सांगितले आहे. त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देण्यास केसीआर तयार झाले असून, त्यांचा स्वत:साठी उपपंतप्रधानपदासाठीचा आग्रह मात्र कायम आहे. मात्र या बैठकीतून केसीआर बिगरकाँग्रेस व बिगरभाजप पक्षांच्या आघाडीची कल्पना सोडण्यास तयार असल्याचे दिसत आहे. अर्थात त्यांच्या उपपंतप्रधानपदासाठी अन्य पक्ष तयार होतील का, हा प्रश्न आहे.

तेलंगणात लोकसभेच्या अवघ्या १७ जागा आहेत. त्या सर्व जागा केसीआर यांच्या टीआरएसने जिंकल्या तरी तृणमूल, समाजवादी पक्ष, बहुजन समाज बक्ष हे तुलनेने मोठे पक्ष केसीआर यांना ते पद देण्यास तयार होतील का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केसीआर विरोधकांच्या महाआघाडीत आल्यास आपली हरकत नाही, असे म्हटले आहे. पण तेही केसीआर यांच्या उपपंतप्रधानपदाच्या प्रस्तावाला तयार होणार नाहीत, असे समजते. द्रमुकचे नेतेही केसीआर यांच्यामागे उभे राहण्याची शक्यता कमी आहे.

मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर आणि मतमोजणीच्या आधी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होईल का आणि त्यास सारे पक्षनेते उपस्थित राहतील का, हे सांगणे तूर्त अवघड आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी निकालांतून चित्र स्पष्ट झाल्यानंतरच अशा बैठकीस अर्थ आहे, असे मत व्यक्त केले आहे. तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचाही निकालांआधी बैठक घेण्यास आक्षेप आहे. अशी बैठक काँग्रेसने बोलवावी, असा चंद्राबाबूंचा आग्रह होता. पण राहुल गांधी हेही बैठकीची घाई न करता निकालांची वाट पाहावी, अशा मताचे असल्याचे समजते.वायएसआरचा पेच चंद्राबाबू नायडू यांचा पक्षविरोधकांच्या महाआघाडीत असल्याने त्यात वायएसआर काँग्रेस सहभागी होईल, याची खात्री नाही. वायएसआर काँग्रेस व तेलगू देशम यांचे आंध्र प्रदेशात अजिबात सख्य नाही. दोघे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे वायएसआरचा पेच कसा सोडवायचा हा काँग्रेसपुढील पेच आहे. शिवाय तेलंगणातील टीआरएसचा मित्र पक्ष असलेल्या अससोद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचा काँग्रेसला कडाडून विरोध आहे. केसीआर यांनी काँग्रेसप्रणीत महाआघाडीत जाऊ नये, असे एमआयएमचे म्हणणे आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019Chennaiचेन्नईTelangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019