शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

"...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते"; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:11 IST

Mamata Banerjee India Alliance News: हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे.

Mamata Banerjee News: इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा उल्लेख न करता नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणूक निकालात इंडिया आघाडीची मानहानीकारक हार झाली. त्यानंतर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडूनच इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल नाराजी सूर उमटण्यास सुरूवात झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी याबद्दल मोठे विधान केले असून, मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करायला तयार आहे, असे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जींचं विधान काँग्रेससाठी मेसेज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

न्यूज१८ बांगला वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवरून काँग्रेसबद्दल खंत व्यक्त केली.

इंडिया आघाडी मी स्थापन केली -ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती चालवण्याची जबाबदारी आहे. ते जर हे व्यवस्थित करत नसतील, तर त्याला मी काय करू शकते. मी फक्त इतकंच म्हणेन की, सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल." 

"...तर मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करेन" 

भाजपविरोधात एक मजबूत शक्ती म्हणून तुमची ओळख आहे, मग तुम्ही इंडिया आघाडीचे नेतृत्व का करत नाही आहात? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या, "जर मला संधी मिळाली, तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करेन. बंगालच्या बाहेर जाण्याची माझी इच्छा नाहीये, पण मी इथून इंडिया आघाडी चालवू शकते", असे उत्तर त्यांनी दिले. 

भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. दोन डझनपेक्षा जास्त पक्ष आघाडीमध्ये आहेत. मात्र, अंतर्गत मतभेद आणि असमन्वयामुळे इंडिया आघाडीला दोन निवडणुकीत फटका बसला आहे. त्यामुळे आघाडीच्या नेतृत्वावर टीका होत आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा काँग्रेसला टोला

ममता बॅनर्जी यांचे विधान तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विधानानंतर आले आहे. कल्याण बॅनर्जी म्हणाले आहेत की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने आपला अंहकार बाजूला ठेवायला हवा. ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षाच्या आघाडीच्या नेत्या म्हणून मान्यता द्यायला पाहिजे, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४