शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:46 IST

...तर तुमचे नाव काहीही असो, तुम्ही आमचे झाला आहात!

बाबा बागेश्वर अर्थता बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानात जन्मलेले आरिफ अजाकिया यांच्यातील संवाद आहे. हा व्हायरल व्हिडिओ ब्रिटनमधील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका कार्यक्रमातील असल्याचे बोलले जात आहे. यात पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी आरिफ आजाकिया यांच्या प्रश्नाचे असे उत्तर दिले की, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये मोहम्मद आरिफ आजाकिया म्हणतात, "माझे नाव मोहम्मद आरिफ आजाकिया आहे, माझा जन्म पाकिस्तानात झाला. माझे पालक भारतीय होते ते १९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानात आले. माझा एक छोटासा प्रश्न आहे की, तुम्ही सर्वजण नशीबवान आहात की, तुम्ही सर्वजण सनातनमध्ये जन्माला आला आहात. मी मुस्लिम कुटुंबात जन्मलो मात्र, भगवद्गीता वाचल्यानंतर हिंदू झालो. मला एक प्रश्न विचारला जातो की, तुमचे नाव मोहम्मद आरिफ आजाकिया आहे, मग तुम्ही हिंदू कसे असू शकता? हिंदू होण्यासाठी नाव बदलणे आवश्यक आहे का? लोक म्हणतात की नाव बदला."

अजाकिया पुढे म्हणाले, "तुम्हाला माहितीच आहे की नाव बदलण्यात किती समस्या येतात. मुलांच्या जन्माच्या दाखल्यांसह अनेक ठिकाणी नावे बदलावी लागतात. तर नाव बदलणे आवश्यक आहे का? नाव न बदलता मी हिंदू राहू शकत नाही का? आपण म्हणालात की भारतीय म्हणून राहा, मग पाकिस्तानात जन्मलेला माणूस जर मनाने हिंदुस्तानी असेल तर तो भारतीय राहू शकत नाही का?"

आजकिया यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणतात, "हिंदुत्व हा धर्म नाही. तो मानवतेचा विचार आहे. मानवतेच्या विचारसरणीसाठी, आम्हाला तुमच्या रंगाशी, तुमच्या दिसण्याशी अथवा तुमच्या देशाशी काही देणे घेणे नाही. जर तुम्ही भगवद्गीता वाचत असाल, तिचे अनुसरण करत असाल, तर तुमचे नाव काहीही असो, तुमची ओळख काहीही असो, आम्ही रहीम रासखान यांचेही गीत गातो आणि जेव्हा जेव्हा देशाचा मुद्दा येतो. तेव्हा आम्ही अब्दुल कलाम यांनाही सॅल्यूट करतो."

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, "जर तुम्ही स्वतःला हिंदू मानत असाल, तर आमच्यासाठी एवढेच पुरेसे आहे. तुम्ही नाव बदला अथवा न बदला, जर तुमच्या मनातील विचार बदलले असतील, तर तुम्ही आमचे झाला आहात." तसेच, "दुसरा प्रश्न आपण विचारलात की, आपला जन्म भारतात झाला नाही, तर पाकिस्तानी भारतीय असू शकत नाही का? सत्य तर असे आहे की, पाकिस्तान देखील आमचाच आहे. १९४७ पूर्वी तुम्ही आमचे होता. फाळणीनंतर एक भिंत बांधली गेली, पण आजही तुम्ही पाकिस्तानीं लोकांचे हृदय कापले तर फक्त भारतीयच निघेल," असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHinduहिंदूMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानIndiaभारत