शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

“माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही,” राहुल गांधींच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 22:54 IST

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत विरोधक आता सक्रिय झाले आहेत.

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत विरोधक आता सक्रिय झाले आहेत. भाजप एकीकडे गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्याची रणनीती तयार करत आहे, तर विरोधकही एकत्रित येण्याच्या प्रयत्नांत आहेत. यामधील सर्वात मोठं नाव म्हणजे नितीश कुमार. गेल्याच महिन्यात त्यांनी बिहारमध्ये अशी राजकीय खेळी खेळली की भाजपला सत्तेपासून दूर केलं. आता नितीशकुमार दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचीही भेट घेतली.

महाराष्ट्रानंतर बिहारच्या राजकारणातही मोठी घडामोड पाहायला मिळाली होती. नितीश कुमार यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसंच त्यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांनी महाआघाडीसोबत जाण्याची घोषणा करत आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, नितीश कुमार यांनी माध्यमांशीही संवाद साधला. बिहारमध्ये आघाडी आहे, त्यामुळे इथे पक्षांच्या नेत्यांची भेट होत आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचीही भेट होईल. अनेक दिवस दिल्लीत आलो नाही, परंतु आता येणं ही काही विशेष बाब नाही. अधिकाधिक विरोधक एकत्र आले तर चांगलं असेल, असं नितीश कुमार म्हणाले. याशिवाय आपली पंतप्रधान बनण्याची कोणतीही इच्छा नाही. अधिकाधिक विरोधकांनी एकत्र यावं यासाठी आम्ही सहकार्य करून. पंतप्रधान पदावर माझा कोणताही दावा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNitish Kumarनितीश कुमारElectionनिवडणूक