शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 15:58 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे.  पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या अनिश्चिततेदरम्यान मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असेही त्यांनी सांगितले. बुधवारी प्रसारमाध्यमांनी संवाद साधताना राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याविषयी भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावर आता मी नाही. आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय पक्षाची कार्यकारी समिती घेईल. तसेच पक्षाने अध्यक्षपदासाठी  विनाविलंब निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड केली पाहिजे. आधीच राजीनामा दिलेला असल्याने मी या प्रकियेमध्ये सहभागी नसेन.''असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने या पराभवाचे उत्तरदायित्व स्वीकारून मी राजीनामा देत आहे,'''असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

 मे महिन्यात आटोपलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. या पराभवामुले व्यथित झालेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेसचा यापुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र राहुल गांधी यांनी आपला निर्णय बदलावा यासाठी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र आज त्यांनी ज्याप्रकारे आपण काँग्रेसचे अध्यक्ष नाही, असे सांगितले त्यावरून ते आपला निर्णय बदलणार नाहीत, असे स्पष्ट होत आहे. दरम्यान, आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी सुमारे 40 मिनिटे चर्चा केली होती. तसेच सोमवारी काँग्रेसच्या पाच राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत त्यांना अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल गांधी यांनी या मुख्यमंत्र्यांची मागणी धुडकावून लावत पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधण्यास सांगितले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण