शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"मी लढणारा योद्धा.."; हिमाचलचे CM  सुखविंदर सिंह सुख्यू यांनी फेटाळल्या राजीनाम्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:01 IST

काँग्रेस पक्ष एकजूट असून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन, असा दावाही मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी केला आहे.

CM Sukhvinder Singh Sukhu ( Marathi News ) : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता स्वत: सुखविंदर सुख्यू यांनी समोर येत या चर्चा फेटाळून लावल्या असून मी राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "मी सामान्य घरातून आलेला आणि संघर्ष करणारा योद्धा आहे. विजय नेहमी संघर्षाचाच होतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण आपलं बहुमत सिद्ध करू," असा विश्वास मुख्यमंत्री सुख्यू यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केलेलं क्रॉस वोटिंग आणि आज सकाळी विक्रमादित्य सिंह यांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र सुख्यू यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. "भाजप घाबरला असल्याने त्यांच्याकडून माझ्या राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या राजीनाम्याने काँग्रेस पक्षात खळबळ उडून आमदार फुटतील असं त्यांना वाटत आहे. मात्र काँग्रेस पक्ष एकजूट असून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन," असा दावाही सुख्यू यांनी केला आहे.

दरम्यान. सरकारकडून  माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा अवमान होत असल्याचं सांगत त्यांचे पुत्र आणि विद्यमान मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आज सकाळी घेतला. तसंच काँग्रेसच्या सहा आमदारांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारलं आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता असताना वर्तवली जात आहे.

हिमाचल प्रदेशातील सरकार वाचवण्यासाठी जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर सोपवली असून मुख्यमंत्र्यांना हटवावं लागलं तरी चालेल पण सरकार कोसळता कामा नये, अशा सूचना काँग्रेस नेतृत्वाकडून या दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा