शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पुढच्या वर्षी भारतात धावणार अशी ट्रेन, जी फक्त जर्मनीकडेच आहे; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 09:48 IST

Hydrogen-powered train : ओडिशातील भुवनेश्वर येथील SOA विद्यापीठातील एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

नवी दिल्ली : रेल्वेविषयी देशातील लोकांच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. प्रवासाची इतर प्रगत साधने कितीही उपलब्ध झाली, तरी रेल्वे प्रवासाविषयी लोकांचे मत वेगळे आहे. भारतीय रेल्वेने देशभरात आपले जाळे पसरवले असून गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या आधुनिकतेवर जास्त भर दिला जात आहे. दरम्यान, आता रेल्वे भारतात हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन्स बनवत असून त्या 2023 पर्यंत तयार होतील. यासंदर्भातील माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. ओडिशातील भुवनेश्वर येथील SOA विद्यापीठातील एका कार्यक्रमात अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वे गतिशक्ती टर्मिनल धोरणांतर्गत रेल्वे नेटवर्कद्वारे दुर्गम भागात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम वेगाने सुरू आहे. याचबरोबर, भारतात हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन्स स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आल्या असून गेल्या दोन वर्षांपासून या ट्रेन्स कोणताही मोठा दोष नसताना धावत आहेत. अशा आणखी वंदे भारत ट्रेन्स आयसीएफमध्ये बनवल्या जात असून त्या लवकरच सेवेत आणल्या जातील, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. 

अलीकडेच वंदे भारत ट्रेनला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तर आतापर्यंत केवळ जर्मनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन्स तयार केल्या आहेत. या वर्षी जर्मनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनची पहिली खेप सुरू केली आहे. फ्रेंच कंपनी आल्सटॉमने 92 मिलियन डॉलर खर्च करून 14 ट्रेन्स तयार केल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वी रेल्वे आणि ट्रॅक व्यवस्थापनाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, "आमचे लक्ष केवळ ट्रेन बनवण्यावर नाही. आम्ही ट्रॅक मॅनेजमेंट सिस्टमवर देखील काम करत आहोत जेणेकरून सेमी हायस्पीड ट्रेन्स चालवता येतील. वंदे भारत ट्रेन्सच्या ट्रायल रनमध्ये आम्ही दाखवले की, 180 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनमध्ये पाण्याने भरलेला ग्लास ठेवला होता आणि तो अजिबात हलला नाही, पण यामुळे जगाला आश्चर्यचकित केले."

72  वंदे भारत ट्रेन्सचे उत्पादन सुरूवंदे भारतच्या यशस्वी चाचणीनंतर उर्वरित 72 ट्रेन्सचे उत्पादन सुरू होईल, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ते म्हणाले, "तिसर्‍या वंदे भारत ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर असेल. हा 52 सेकंदात 0-100  किमी प्रतितास वेग पकडेल. तर बुलेट ट्रेन हा वेग 55 सेकंदात पकडते. पहिल्या टप्प्यातील वंदे भारत ट्रेन्स 54.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकतात आणि 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. सध्या दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. एक नवी दिल्ली ते वाराणसी आणि दुसरी नवी दिल्ली ते वैष्णोदेवीपर्यंत धावते."

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव