शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

uttarakhand glacier burst : महापुरात वाहून गेलाय पती, 3 महिन्याच्या चिमुकल्यासह वाट पाहतेय आई 

By महेश गलांडे | Updated: February 11, 2021 09:43 IST

uttarakhand glacier burst : उत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देउत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे.

चामोली - उत्तराखंडमधील महापुरातील दुर्घटनेमुळे देश हळहळला, संसद सभागृहातही गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडमधील घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती दिली. या दुर्घटनेत चामोलीतील एक कंपनीच वाहून गेली असून 200 पेक्षा जास्त कामगार बेपत्ता आहेत. एनडीआरएफ जवानांसह वायू दलाचे जवानही सध्या येथील शोधमोहिमेत शर्थीचे प्रयत्न करत आहेत. येथील राणी गावाचा संपर्कच देशाशी तुटला आहे. त्यामुळे, एका नवजात शिशूला जन्म देणारी आई आपल्या बाळासह त्याच्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामुळे काळजीत आहे. 

उत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे. रविवारी आलेल्या महापुरानंतर रैनी गावातील पुष्पा नामक महिलेचा पती बेपत्ता आहे, त्यामुळे ती अतिशय चिंताग्रस्त आहे. रैनीसह एकूण 12 गावांचा संपर्क या महापुराच्या भीषण दुर्घटनेमुळे तुटला आहे. गावाला जोडणारा पूलही या महापुरात वाहून गेलाय. त्यावेळी, पुष्पा यांचे पती यशपाल सिंह हे त्यांच्या कामावर कार्यरत होते. यशपाल सिंह हे नदीपासूनच जवळच्या ठिकाणीच काम करत होते. त्यामुळे, आपल्या पतीच्या आणि 3 महिन्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या काळजीनं पुष्पा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 

माझ्या तीन महिन्यांच्या बाळाच्या भविष्याचं काय? या काळजीत पुष्पा गेल्या दोन दिवसांपासून रडत आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये पुष्पा यांचं यशपालसोबत लग्न झालं होतं. तर, तीन महिन्यांपूर्वच पुष्पाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या गावांचा संपर्क तुटल्यामुळे पुष्पासह त्यांच्या शेजारील कुटुंबांकडेही खायला अन्न नाही, घराती अन्नाचा साठा संपत आला आहे.     उत्तराखंडमध्ये विविध सुरक्षा संस्थेचे जवान गेल्या चार दिवसांपासून बचाव कार्य करीत आहेत. तपोवन बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि दूरसंवेदी उपकरणांचा वापर केला जात आहे. या बोगद्यात हजारो टन चिखल मातीच्या गाळाचे ढिगारे साचले आहेत. आतापर्यंत ३४ मृतदेह सापडले असून, अन्य १७० जण बेपत्ता आहेत. बोगद्यात अडकलेल्या लोकांचा बचाव करण्यासाठी अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध साधनांचा वापर केला जात आहे, असे उत्तराखंड पोलीसचे मुख्य प्रवक्ते आणि उपमहानिरीक्षक नीलेश आनंद भरणे यांनी घटनास्थळी सांगितले. 

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडाfloodपूरDeathमृत्यू