शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

नवऱ्याने जमीन विकून बायकोला शिक्षणासाठी कॅनडाला पाठवलं; पण तिने दुसरं लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 12:48 IST

हरमिंदर सिंहने सांगितलं की, 12 वर्षांपूर्वी बटाला जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं आणि घरच्यांच्या संमतीनं दोघांचं लग्न ठरलं.

भारतात लग्न करून परदेशात गेलेल्या मुली अनेकदा तिथे जाऊन पुन्हा लग्न करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंजाबमधील बटालाजवळील पेरेशाह गावात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथे राहणाऱ्या हरमिंदर सिंहची पत्नी चांगल्या भविष्याच्या आशेने कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेली होती. मात्र यानंतर तिने पतीला तेथे बोलावले नाही.या संदर्भात कुटुंबीयांच्या वतीने एसएसपी कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 

या प्रकरणाची माहिती देताना हरमिंदर सिंहने सांगितलं की, 12 वर्षांपूर्वी बटाला जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं आणि घरच्यांच्या संमतीनं दोघांचं लग्न ठरलं. लग्नानंतर सुमारे तीन महिन्यांनी पत्नी कॅनडाला गेली. पतीने सांगितले की, दोघांनीही चांगल्या भविष्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याने पत्नीला कॅनडाला शिक्षणासाठी पाठवलं. यावेळी त्याने पत्नीची कॉलेजची फीही भरली. त्यासाठी वडिलोपार्जित जमीनही विकली.

पत्नी एक वर्षानंतर पंजाबमध्ये आली होती. मात्र नंतर ती पुन्हा कॅनडाला गेली. आता कॅनडामध्ये राहणाऱ्या तिच्या मित्रमैत्रिणींनी माहिती दिली आहे की त्याच्या पत्नीचं कॅनडामध्ये दुसरं लग्न झालं आहे. त्याने पत्नीशी संपर्क साधला असता तिने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पतीसह कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. आता त्याच्या पत्नीने त्याचे सर्व फोन नंबर ब्लॉक केले आहेत. 

तरुणाची आई सुरजित कौर यांनी सांगितलं की, 12 वर्षांपासून कॅनडाला जाण्याच्या आशेवर असलेल्या आपल्या मुलाची मोठी फसवणूक झाली, ज्यामुळे त्याचं मन खूप दुखावलं आहे. तक्रार दाखल केली असून न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली आहे. त्याचवेळी, पोलिसांनी हरमिंदर सिंहला या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय दिला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :marriageलग्न