शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

बाबो! 3 मुलांच्या आईने प्रियकरासोबत घेतल्या सप्तपदी; 3 महिन्यांपूर्वीच पतीचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 11:33 IST

तीन मुलांच्या आईने आता प्रेमविवाह केला आहे. एक महिन्यापूर्वी ओळख झाली आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या पतीच्या निधनानंतर तीन मुलांच्या आईने आता प्रेमविवाह केला आहे. एक महिन्यापूर्वी ओळख झाली आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रविवारी छतरपूर येथे पालिकेने मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत आयोजित सामूहिक विवाह परिषदेत या दोघांनी लग्न केलं. लग्नात मुलाच्या बाजूने संपूर्ण कुटुंब उपस्थित होते, परंतु वधूच्या बाजूने फक्त तिची तीन मुले उपस्थित होती. पानगर गावात राहणाऱ्या सुशीला कुशवाहाचा विवाह सर्वात अनोखा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनगुवां येथील रहिवासी अज्जू कुशवाहासोबत सुशीलाने सप्तपदी घेतल्या. सुशीलाने सांगितले की, तिच्या पतीने काही महिन्यांपूर्वी विष घेतले होते. अचानक पतीची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. कौटुंबिक वाद आणि कर्जामुळे पतीने हे पाऊल उचलले. त्याने तिला आणि मुलांना एकटे सोडले. कौटुंबिक वाद आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घेतलेले कर्ज हे पतीच्या मृत्यूचे कारण ठरले. 

तीन महिन्यांपूर्वी पतीने विष घेतले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याला वाचवता आले नाही. पतीच्या निधनानंतर एकाकी पडले आणि तीन मुलांची जबाबदारीही माझ्यावर आली असं महिलेने म्हटलं आहे. महिनाभरापूर्वी गावापासून आठ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या अज्जू कुशवाह ओळख झाली. दोघेही एकाच समाजाचे आहेत. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 

अज्जूचे लग्न झाले नव्हते. महिलेने तिची व्यथा सांगितली तर तो शांतपणे ऐकत असे. तो समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा. अज्जूने लग्नाची इच्छा व्यक्त केल्यावर क्षणाचाही विलंब न लावता महिलेने होकार दिला. अज्जूने मुलांना त्याचे नाव देण्यास होकार दिला. कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. पण दोघं लग्न करण्यावर ठाम होते. त्यांनी अखेर लग्न केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न