शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चक्रिवादळ आले आणि मच्छिमारांचे नशीबच पालटले, किनाऱ्यावर सोने मिळू लागले

By बाळकृष्ण परब | Updated: November 28, 2020 15:46 IST

Andhra Pradesh News : समुद्र किनाऱ्यावरील वाळूत सोन्याचे कण मिळू लागल्यानंतर स्थानिक मच्छिमारांच्या आनंदाला पारावार उरला नाही. समुद्र किनाऱ्यावर सोने मिळत असल्याची गोष्ट सगळीकडे पसरली. बघता बघता सोने गोळा करण्यासाठी किनाऱ्यावर लोकांची गर्दी झाली.

काकीनाडा (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका समुद्र किनाऱ्यावर असलेल्या उप्पदा गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या निवार चक्रिवादळानंतर येथील गावातील लोकांचे नशीबच पालटले आहे. शुक्रवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा येथील लोक समुद्र किनाऱ्यावर गेले तेव्हा त्यांना तिथे छोट्या मोत्याच्या आकाराएवढे सोन्याचे तुकडे मिळू लागले.समुद्र किनाऱ्यावरील वाळूत सोन्याचे कण मिळू लागल्यानंतर स्थानिक मच्छिमारांच्या आनंदाला पारावार उरला नाही. समुद्र किनाऱ्यावर सोने मिळत असल्याची गोष्ट सगळीकडे पसरली. बघता बघता सोने गोळा करण्यासाठी किनाऱ्यावर लोकांची गर्दी झाली.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ५० लोकांना समुद्र किनाऱ्यावर सुमारे तीन हजार ५०० रुपयांचे सोने मिळाले. यादरम्यान, अनेकजण सोने मिळेल या अपेक्षेने किनाऱ्यावरील वाळू चाळून पाहत होते. मात्र उप्पदा गावातील समुद्र किनाऱ्यांवर सोन्याचे तुकडे मिळण्याचे काय कारण आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र स्थानिक पोलिसांनी सांगितले की, समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यावरील काही मंदिरे तुटण्याची घटना घडली होती. तसेच लाटांमुळे काही घरेसुद्धा कोसळली होती. गेल्या दोन दशकांत सुमारे १५० एकर जमीन समुद्रात गेली आहे.दरम्यान, किनाऱ्यावर सापडलेल्या सोन्याची दखल महसूल विभागाने घेतली आहे. तसेच आज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावाचा दौरा केला. एएएसआय लवू राजू यांनी सांगितले की, समुद्र किनाऱ्यावर केवळ काही मोजक्या लोकांनाच सोने मिळाले. येथे सोन्याच्या शोधात आलेला प्रत्येकजण काही भाग्यवान नव्हता.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशGoldसोनंJara hatkeजरा हटके