वादळीवारा, गारांनी शहराला झोडपले
By Admin | Updated: May 28, 2014 01:02 IST2014-05-28T00:22:11+5:302014-05-28T01:02:31+5:30
रोहिणी बरसल्या : वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान; घरांचे पत्रे उडाले

वादळीवारा, गारांनी शहराला झोडपले
रोहिणी बरसल्या : वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान; घरांचे पत्रे उडाले
नाशिक : सोमवारी जिल्ात हजेरी लावलेल्या रोहिणीच्या पावसाने शहराला आज वादळीवार्यासह झोडपून काढले. सोसाट्याच्या वादळीवार्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले, तर अनेक घरांचे पत्रे उडून गेले, भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या.
सकाळपासून शहरात उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे उकाड्यानेही नागरिक हैराण झालेले असताना, दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळीवारा वाहू लागला. काही मिनिटांच्या वादळीवार्यामुळे अवघे शहर धूलिकणांनी झाकोळून गेले होते. या वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्याने अनेक भागातील वीजप्रवाह खंडित झाला होता. यानंतर काही वेळातच रोहिणीच्या जोरदार जलधारा बरसू लागल्या. त्यातच गारांचाही वर्षाव झाल्याने नाशिककरांची धांदल उडाली. जोरदार वादळीवार्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. या उन्मळून पडलेल्या वृक्षांखाली सापडून अनेक वाहनांचेही नुकसान झाले. उपनगरीय परिसरातील झोपडप्यांतील घरांचे पत्रे वादळीवार्याने उडून गेले, तर काही घरांच्या भिंतीही कोसळल्या.
वृक्ष उन्मळून वाहनांचे नुकसान
जिल्हाधिकारी कार्यालयातील वृक्ष उन्मळून पडल्याने चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. जुना गंगापूर नाका येथेही वृक्ष उन्मळून पडल्याने एका रिक्षाचे नुकसान झाले. जेहान सर्कल परिसरातील वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली. पंचवटी कारंजा येथे २०० वर्षांचा पुरातन वृक्ष वादळीवार्यामुळे उन्मळून पडला. मखमलाबादकडून रामवाडीकडे जाणार्या रस्त्यावरही वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी सदरचा वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
घरांचे उडाले पत्रे
वडाळागावातील राजवाडा परिसरातील अनेक घरांचे पत्रे वादळीवार्यामुळे उडून गेले, तर एका घरावर गुलमोहराचे झाड उन्मळून पडल्याने घराचे नुकसान झाले. तसेच केबीएच विद्यालयातही दोन निलगिरीचे वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली. त्याचप्रमाणे पंचवटीतील वाघाडी नाल्यालगतच्या वाल्मीकनगरमधील बुरुड डोह येथील अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. सदरची वस्ती ही मोलमजुरी करणार्यांची असून, वादळीवारा अन् पावसामुळे त्यांच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.