शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या समर्थनार्थ शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जमले, आंदोलनात मात्र चाळीसच उरले, बाकीचे खाऊन-पिऊन घरी पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:42 IST

Congress Protest: राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. मात्र आंदोलनासाठी केवळ ४० कार्यकर्ते पोहोचले. उर्वरित कार्यकर्ते आणि पदाधिकारी जेऊन-खाऊन पसार झाले.

जयपूर - राजस्थानमधील उदयपूर येथे शहर जिल्हा कमिटीच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. सुमारे दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांनी कार्यशाळेत भोजन केले. त्यानंतर ते सर्वजण राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. मात्र आंदोलनासाठी केवळ ४० कार्यकर्ते पोहोचले. उर्वरित कार्यकर्ते आणि पदाधिकारी जेऊन-खाऊन पसार झाले.

तर दुसऱ्या दिवशी ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने नवसंकल्प घोषणापत्राच्या अंमलबजावणीसाठी चर्चा करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी ३५० हून अधिक कार्यकर्ते पोहोचले होते. तिथेही त्यांनी भोजनावर ताव मारला. त्यानंतर या सर्वांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन नियोजित होते. मात्र आदल्या दिवशी लंच नंतर बेपत्ता झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांप्रमाणे हे कार्यकर्तेसुद्धा गायब झाले. त्यामुळे प्रत्यक्ष आंदोलनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. एकूण ३५० कार्यकर्त्यांपैकी केवळ १०० कार्यकर्तेच कलेक्टर कचेरीसमोर पोहोचले.

गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची चौकशी ईडीकडून केली जात आहेत. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसत आहे. मात्र उदयपूरमधील काँग्रेसचं आंदोलन चर्चेचा विषय ठरलं आहे. राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून आंदोलन नियोजित असताना त्यातील मोजके कार्यकर्ते वगळता इतरांनी घरची वाट धरल्याने या आंदोलनाचा फज्जा उडाल्याची चर्चा होत आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीRajasthanराजस्थान