शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पश्चिम त्रिपुराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा, 382 घरांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 10:15 IST

पश्चिम त्रिपुराला बुधवारी (16 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पावसामुळे 300 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे.

ठळक मुद्देपश्चिम त्रिपुराला बुधवारी (16 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पावसामुळे 300 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

आगरतळा - पश्चिम त्रिपुराला बुधवारी (16 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पावसामुळे 300 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे तब्बल 382 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच आगरतळा महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी पाणी साचले आहे. 

राज्याचे मुख्य सचिव एल. के. गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पश्चिम त्रिपुरातील या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ज्या ठिकाणी पाणी साचले आहे तेथे पाण्याच्या योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याचे आदेश दिले आहेत. अनेक ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पश्चिम त्रिपुरातील या परिस्थितीवर सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने विजेच्या खांबावर झाडं उन्मळून पडल्याने खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच सरकारचे या स्थितीवर लक्ष असून त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. बुधवारी सरासरी 19.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Cyclone Fani : ओडिशामध्ये फनीचा तडाखा; आत्तापर्यंत 64 जणांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला होता. 64 जणांचा वादळाच्या तडाख्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. 3 मे रोजी ओडिशा येथे 240 किमी प्रतितास वेगाने आलेल्या चक्रीवादळात जवळपास 241 जण जखमी झाले आहेत. शनिवारपर्यंत मृतांचा आकडा 43 वर होता तो वाढून आता 64 झाला आहे. पुरी जिल्ह्याशिवाय खुर्दा जिल्ह्यात 9 जण, कटक जिल्ह्यात 6, मयूरभंजमध्ये 4, केंद्रपाडा आणि जाजपुर येथे प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला.

ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले होते. वीज पूरवठा खंडीत झाला होता. फनी या चक्रीवादळाचा फटका 1 कोटी 50 लाख नागरिकांना बसला आहे. सरकारकडून 12 मे पर्यंत वीजपूरवठा पूर्ववत होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे पुरी, अंगुल, मयूरगंज, केंद्रपाडा या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. ओडिशामध्ये 1999 मध्ये आलेल्या सुपर सायक्लोनमध्ये राज्यातील 10 हजारपेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला होता. याआधी 2018 मध्ये आलेल्या तितली वादळात 60 लोकांचा मृत्यू झाला होता तर 2013मधील फालिन वादळात 44 लोकांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :Tripuraत्रिपुराRainपाऊस