शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हमीद अन्सारी यांची पत्नी चालवत असलेल्या मदरशाच्या पाण्यात उंदीर मारण्याचं विष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 11:02 IST

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची पत्नी सलमा चालवत असलेल्या मदरशात अज्ञात इसमांनी पाण्याच्या टाकीत उंदीर मारण्याचं विष टाकल्याचं प्रकरण समोर आलं आहे.  

ठळक मुद्देमाजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची पत्नी सलमा चालवत असलेल्या मदरशात अज्ञात इसमांनी पाण्याच्या टाकीत उंदीर मारण्याचं विष टाकल्याचं प्रकरण समोर आलं आहे.  अलिगडमध्ये असलेल्या या चाचा नेहरू मदरशात ४ हजार मुलं शिकण्यासाठी येतात. अल नूर चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था हा मदरसा चालवते. सलमा अन्सारी या चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख आहेत.

आग्रा, दि. 19- माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची पत्नी सलमा अन्सारी चालवत असलेल्या मदरशात अज्ञात इसमांनी पाण्याच्या टाकीत उंदीर मारण्याचं विष टाकल्याचं प्रकरण समोर आलं आहे.  अलिगडमध्ये असलेल्या या चाचा नेहरू मदरशात ४ हजार मुलं शिकण्यासाठी येतात. अल नूर चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था हा मदरसा चालवते. सलमा अन्सारी या चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

 'हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक आहे. ही गोष्ट मला समजल्यावर मी मदरशाच्या वॉर्डनना पोलिसात तक्रार दाखल करायला सांगितली होती. हा संपूर्ण प्रकार पाहता आम्ही आता या मदरशात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे, असं सलमा अन्सारी यांनी म्हंटलं आहे. 

'वसतिगृहात राहणार एक मुलगा मोहम्मद अफजल हा शुक्रवारी संध्याकाळी पाणी पिण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याला दोन माणसं पाण्याच्या टाकीत गोळ्या टाकताना दिसली. त्याने त्यांना हटकलं, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याला पिस्तुल दाखवून गप्प राहण्यास सांगितलं.' ती दोन माणसं तिथून निघून गेल्यावर त्या मुलाने हा संपूर्ण प्रकार वॉर्डनला सांगितला. त्या माणसांनी तिथेच टाकलेलं गोळ्यांचं रॅपर दाखवलं. त्यावेळी तात्काळा पाण्याचा पुरवठा तत्काळ थांबवण्यात आला, असं मदरशाच्या वॉर्डन जुनैद सिद्धिकी यांनी सांगितलं आहे. 

सुदैवाने मदरशामध्ये घडलेला प्रकार एका विद्यार्थ्याने पाहिला आणि त्याने तात्काळ वॉर्डनला याबद्दल सांगितलं. आम्ही मदरशातील पाण्याचे नमुने घेतले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचं अलीगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश पांडे यांनी सांगितलं आहे.  'उंदीर मारण्याचं औषध विषारी असलं तरी ते विशिष्ट अँटिकॉग्युलंटसोबत मिसळून दिल्याशिवाय माणसं मरू शकत नाहीत. पण आजारी पडू शकतात, असं अलिगडच्या जे. एन. मेडिकल कॉलेजचे डॉ. ऐहतीशाम अहमद म्हणाले आहेत. 

देशात मला असुरक्षित वाटतं, असं उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत असताना हमीद अन्सारी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर भाजपाकडून कडाडून टीका झाली होती.